शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

कोरोना प्रादुर्भावामुळे रस्ते झाले सुनेसुने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:36 IST

अंबाजोगाई : सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसं कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी ...

अंबाजोगाई : सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसं कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी झाली आहेत. यामुळे आपापसातला संवादच जणू हरपल्याची स्थिती झाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

एरव्ही सकाळी सात वाजताच गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घोळक्याने उभे असलेले गावकरी आता दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला दांडीच्या पातेल्यात उकळी फुटलेल्या चहाच्या वाफा नाहीत की, त्याचा दरवळ नाही. कढईत उकळणाऱ्या तेलातल्या भाज्यांचा व वड्यांचा सुर्र आवाजही नाही अन्‌ गावात घडलेल्या घटनांची चर्चाही नाही. गावच्या राजकारणाचा व घडामोडींचा आखाडा समजल्या जाणाऱ्या या चहा व पानटपऱ्या सध्या ओस पडल्या आहेत. चल ऊठ.. या गोष्टीवर चहा पाजतो.. असे हातावर टाळी देऊन दणक्यात आवाज देणारा वर्ग रस्त्यावरून गायब झाला आहे. त्यामुळे चहा पाजणारे व चहा पिणारे कोणीच दिसत नाहीत.

सकाळच्या गप्पा व चहा टपरीवर जाऊनच घ्यायचा असा दिनक्रम असलेल्या मंडळींची संख्या ग्रामीण भागात मोठी असते. त्यामुळे सकाळपासूनच गावातील रस्ते गर्दीने फुलून जातात. कोरोनामुळे गावाकडचे रस्ते जणू मुके झाल्याचा अनुभव सध्या येत आहे. नेहमी गर्दीतून वाट काढताना हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकी गाड्या व चारचाकी वाहने आता रस्ते निर्मनुष्य असल्याने भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत. गावच्या पारावर, ओट्यावर व चावडीवर रंगणारी गप्पांची मैफल आता लुप्त झाली आहे.

...

घरात होतेय घुसमट

घरात बसून अनेकांची घुसमट होत आहे. परस्परातील संवाद दुरावला आहे. केव्हा हा कोरोना संपतो व सगळं सुरळीत होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबाजोगाई-अहमदपूर रस्त्यावर पूस, घाटनांदूर असो की लोखंडी, आपेगाव, राडी, पाटोदा, देवळा, ममदापूर यांच्यासह ग्रामीण भागातील, गावातील वर्दळ सध्यातरी ठप्प झाली आहे.