शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोरोनामुळे क्षयरोग शोधमोहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

.... लोककलावंतांना आर्थिक मदत द्या वडवणी : कोरोनामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील लोककलावंतांचे ...

....

लोककलावंतांना आर्थिक मदत द्या

वडवणी : कोरोनामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील लोककलावंतांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शासनाने लोककलावंतांना मदत करावी, अशी मागणी मोरनृत्य कलावंत जगन कलाल यांनी केली आहे.

...

बोगस बियाणे खरेदी करू नका

वडवणी : गेल्या वर्षी काही प्रमाणात बोगस बियाणे खरेदी करून लागवड झाली. मात्र, पुन्हा बोगस बियाणांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावर्षी खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीची पूर्वतयारी करीत आहेत. खते, बियाणे घेताना त्याची खात्री करूनच खरेदी करावी. बियाणे बोगस असल्याचा संशय आल्यास तात्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांनी केले आहे.

....

धूरफवारणी करण्याची मागणी

वडवणी : शहरातील अनेक प्रभागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने धूरफवारणी करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील बाजारपेठेत, मुस्लीम मोहल्ला, मंदिर परिसर, बसस्थानक परिसर, शिक्षक काॅलनी, पाॅवरलूम गल्ली, पाटील गल्ली, राम मंदिर परिसर, अशा विविध भागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात जनजागृती केली जात आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

.....

खरिपाची तयारी पूर्ण, पावसाची प्रतीक्षा

वडवणी : शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरले आहे, लवकरच पावसाची हजेरी लागणार असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

....

स्वच्छता मोहीम रखडली

वडवणी : शहरातील गलोगल्ली नाल्यांची अनेक दिवसांपासून स्वच्छता मोहीम रखडली आहे. नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यांचे व्यवस्थापन बरोबर नसल्यामुळे शहरातील गल्लीचे सांडपाणी नाल्यात न जाता रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमी घाण साचलेली असते. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आता काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून, त्यापूर्वी नाल्यांची सफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.