शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोरोनामुळे पाण्याचे जारवाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:32 IST

बंदचा परिणाम : मागणीअभावी जार मालक, चालक, कामगार आर्थिक संकटात गेवराई : उन्हाळ्यात तसेच एरव्ही शहरातील व ग्रामीण ...

बंदचा परिणाम : मागणीअभावी जार मालक, चालक, कामगार आर्थिक संकटात

गेवराई : उन्हाळ्यात तसेच एरव्ही शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने, घरी, लग्न समारंभासह कार्यक्रमांच्या विविध ठिकाणी शुद्ध व थंडगार पाणीपुरवठा करणारे जार मालक व चालक कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही बेजार झाले आहेत. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे दुकाने बंद, लग्न समारंभ होत नसल्याने पाणी विक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी येथील जार मालक, चालक,क र्मचाऱ्यांनी केली आहे.

मागील वर्षी उन्हाळा सुरू झाल्याबरोबर मार्च महिन्यात कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तब्बल तीन महिने सर्व व्यापारी पेठा, लग्न समारंभासह सर्व काही बंद होते. तसेच याहीवर्षी उन्हाळा सुरू झाला की, व्यापारी पेठा, लग्न, धार्मिक कार्यक्रम बंद झाल्यामुळे शहरातील व तालुक्यातील अनेक जार मालक, चालक, कामगारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काहीजणांनी कर्ज काढून थंड पाण्याचे प्लांट उभारले असून गुंतवणूक केली आहे. आता कर्जाचे हप्ते कसे फेडावे, अशी चिंता आता जार मालकांना पडली आहे.

गतवर्षी व याहीवर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे व्यापारी पेठा, लग्न समारंभ, यात्रा उत्सवसह अनेक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे दुकानदार व लग्नात जार घेत नाहीत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचे येथील जार मालक राजेश राठोड यांनी सांगितले.

आम्ही जार मालकाकडे रोजंदारीवर असून कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने आमचे नुकसान झाले आहे. पगारही वेळेवर मिळत नसल्याचे कामगार किरण भोसले यांनी सांगितले.

===Photopath===

200421\522520210420_121354_14.jpg