शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

कोरोनामुळे पाण्याचे जारवाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:32 IST

बंदचा परिणाम : मागणीअभावी जार मालक, चालक, कामगार आर्थिक संकटात गेवराई : उन्हाळ्यात तसेच एरव्ही शहरातील व ग्रामीण ...

बंदचा परिणाम : मागणीअभावी जार मालक, चालक, कामगार आर्थिक संकटात

गेवराई : उन्हाळ्यात तसेच एरव्ही शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने, घरी, लग्न समारंभासह कार्यक्रमांच्या विविध ठिकाणी शुद्ध व थंडगार पाणीपुरवठा करणारे जार मालक व चालक कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही बेजार झाले आहेत. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे दुकाने बंद, लग्न समारंभ होत नसल्याने पाणी विक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी येथील जार मालक, चालक,क र्मचाऱ्यांनी केली आहे.

मागील वर्षी उन्हाळा सुरू झाल्याबरोबर मार्च महिन्यात कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तब्बल तीन महिने सर्व व्यापारी पेठा, लग्न समारंभासह सर्व काही बंद होते. तसेच याहीवर्षी उन्हाळा सुरू झाला की, व्यापारी पेठा, लग्न, धार्मिक कार्यक्रम बंद झाल्यामुळे शहरातील व तालुक्यातील अनेक जार मालक, चालक, कामगारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काहीजणांनी कर्ज काढून थंड पाण्याचे प्लांट उभारले असून गुंतवणूक केली आहे. आता कर्जाचे हप्ते कसे फेडावे, अशी चिंता आता जार मालकांना पडली आहे.

गतवर्षी व याहीवर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे व्यापारी पेठा, लग्न समारंभ, यात्रा उत्सवसह अनेक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे दुकानदार व लग्नात जार घेत नाहीत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचे येथील जार मालक राजेश राठोड यांनी सांगितले.

आम्ही जार मालकाकडे रोजंदारीवर असून कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने आमचे नुकसान झाले आहे. पगारही वेळेवर मिळत नसल्याचे कामगार किरण भोसले यांनी सांगितले.

===Photopath===

200421\522520210420_121354_14.jpg