शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

दिलासादायक ! मांजरा धरण भरण्यासाठी ५४ दलघमी.ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:17 IST

Manjara Dam News बीड, लातूर, उस्मानाबादसह १७२ गावांची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणात १४ ऑक्टोबरपर्यंत ७६ टक्के पाणीसाठा

ठळक मुद्देधरणात १७१.१८३ दलघमी पाणीसाठा 

अंबाजोगाई : बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गावाची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज १४ ॲाक्टोबर रोजी सकाळपर्यंत ७६ टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला. धरणक्षेत्रात पाण्याचा ऐवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याही वर्षी धरण पुर्णक्षमतेने भरेल आणि धरणाची दरवाजे उघडण्याची वेळ प्रशासनावर येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

यावर्षी जुन महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली असल्यामुळे मराठवाड्यात सर्वच मोठी धरणे ओसांडुन वाहत आहेत. मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासुन १४ बंधारे आणि लहान मोठे असे २६ तलाव निर्माण करण्यात आल्यामुळे अलिकडील कांही वर्षात मांजरा धरण भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत ‘मांजरा’ तग धरुन उभे राहण्याचा प्रयत्न करतेयच! अलिकडे पर्जन्यमानात झालेली कमी आणि मोठ्या पुढा-यांची पाणी ओढण्यासाठी निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा बीड-लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या गावातील माणसांची, जनावरांची, पक्षांची, पिकांची तहान भागवणा-या मांजरचा गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि या १७२ गावातील लोकप्रतिनिधी, छोटे-मोठे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते हा सर्व प्रयत्न अतिशय थंड डोक्याने पहात आहेत.

यासर्व अडचणींचा मुकाबला करीत मांजरा नदी आणि धरण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासर्व अडथळ्यांच्या स्पर्धेमुळे आता मांजरा भरण्यास विलंब लागत आहे. आज १४ आँक्टोबर रोजी मांजरा धरणात ७६ टक्यापेक्षा ही जास्त पाणी साठा जमा झाला आहे. सध्या बेडुक नक्षत्र सुरु आहे. या नक्षत्रात चांगला पावूस पडतो असे संकेत आहेत. शिवाय कमी दाबाचा निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे आपल्या भागात या चार दिवसांत सांगितलेल्या मोठ्या पावसाचा आपल्याला लाभ होणार अशी चिन्हे अधिक आहेत. याशिवाय नेहमी तारणारा परतीचा पावूस ही अजून शिल्लक आहेच. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार केला तर काही दिवसांत मांजरा धरण भरल्याची व धरणाचे दरवाजे उघडल्याची गोड बातमी आपणास ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

धरणात १७१.१८३ दलघमी पाणीसाठा मांजरा धरणाची संपुर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दलघमी एवढी असून आज धरणात १७१.१८३ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी ५४ दलघमी पाणी साठ्याची आवश्यकता आहे. आज मांजरा नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर प्रति सेकंदास ४.९१८ घ.मी. एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे. धरणक्षेत्राच्या कँचमेंट एरीयात आणखी जोराचा पावूस झाला तरहे प्रमाण वाढु ही शकेल. मांजरा नदीची क्षमता प्रति सेकंदास १६६.४४२ घनमीटर एवढे पाणी धरणात आणण्याची आहे. धरण भरण्यासाठी कसली प्रकारची अडचण येईल, असे वाटत नाही.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडWaterपाणी