शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

नागरिक बिनधास्त; मास्क, सॅनिटायझरची विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:38 IST

अंबाजोगाई व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या ...

अंबाजोगाई व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव म्हणून मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे. हे नियम सांगितले जात होते व पालनही होत असे. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा असाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मार्च ते मे या तीन महिन्यात मास्कच्या विक्रीतही मोठी वाढ झाली होती. जून महिन्यापासून लाट ओसरत असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. आता मास्क वापरणेही अनेकांनी बंद केले आहे. सुरक्षिततेच्या त्रिसूत्रीचा विसर अनेकांना पडू लागला आहे.

त्रिसूत्रीचे पालन महत्त्वाचे

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. आपल्या परिसरात दररोज ४ ते ५ रुग्ण बाधित निघत आहेत. याशिवाय तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती व्यक्त होत आहे. यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझर व सतत हात धुणे ही त्रिसूत्री कायम चालू राहू द्या. सुरक्षिततेसाठी लसीकरणाचे दोन डोस घ्या.

- डॉ. अतुल शिंदे,

मधुमेह तज्ज्ञ, अंबाजोगाई.