शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

बालविवाह; मुलांना बोहल्यावर चढविण्यात बीड राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल घेतल्याने तब्बल ६८ बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि संस्थांना यश आले आहे. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. परभणीत सर्वाधिक ४८ टक्के बालविवाहाचे प्रमाण असून, त्यापाठोपाठ बीडचे ४३.७ टक्के आहे. हे बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन, संस्थांनी आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.

मुलीचे वय १८, तर मुलाचे २१ पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाह लावावा, असा नियम आहे. परंतु ग्रामीण भागात आजही लोक अल्पवयीन मुलांनाच बोहल्यावर चढवत असल्याचे दिसते. शासन, संस्थांकडून जनजागृती होत असल्याने लोक तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी आजही लोकांची मानसिकता बदललेली नसून, बालविवाहाचे प्रमाण वाढतच चालल्याचे दिसते. आतापर्यंत रोखलेले हे बालविवाह पोलीस, बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन आणि छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानने रोखले आहेत.

कोरोनाच्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बालविवाह वाढले

कोरोनाकाळात अनेकांनी चोरून विवाह लावले. त्याची शासन दप्तरी नोंदही झाली नाही. ज्यांनी तक्रारी केल्या असे ६८ बालविवाह रोखण्यात आले. परिस्थिती, मुलींची असुरक्षितता, रोजगार, आदी कारणे याला होती. त्यामुळेच बालविवाह वाढत असल्याचे मत बालकल्याण समितीचे तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.

१३ सदस्यांची बालसंरक्षक समित्या पाहतात काम

बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात ९५० बालसंरक्षक समित्या आहेत. यात मुख्याध्यापक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी, १२ ते १८ वर्षांमधील मुलगा व मुलगी, शालेय समितीचा अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवक असे विविध पदाधिकारी या समितीत असतात.

बालविवाह कायदा काय आहे?

मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करणे बंधनकारक आहे. त्या आगोदर विवाह लावल्यास तो गुन्हा ठरतो. यात शिक्षेसह एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. याबाबत शासनस्तरावरून वारंवार जनजागृती केली जात आहे.

आमच्याकडे तक्रार आली की प्रशासन व पोलिसांना माहिती देऊन तत्काळ गावात जातो. वयाचा दाखला तपासून खात्री केली जाते. वधू व वराच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून नोटीस बजावली जाते. तरीही एखाद्याने विवाह लावल्यास कारवाई केली जाते. याबाबत जनजागृतीही केली जात आहे.

- तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य बीड