शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बालविवाह; मुलांना बोहल्यावर चढविण्यात बीड राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल घेतल्याने तब्बल ६८ बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि संस्थांना यश आले आहे. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. परभणीत सर्वाधिक ४८ टक्के बालविवाहाचे प्रमाण असून, त्यापाठोपाठ बीडचे ४३.७ टक्के आहे. हे बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन, संस्थांनी आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.

मुलीचे वय १८, तर मुलाचे २१ पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाह लावावा, असा नियम आहे. परंतु ग्रामीण भागात आजही लोक अल्पवयीन मुलांनाच बोहल्यावर चढवत असल्याचे दिसते. शासन, संस्थांकडून जनजागृती होत असल्याने लोक तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी आजही लोकांची मानसिकता बदललेली नसून, बालविवाहाचे प्रमाण वाढतच चालल्याचे दिसते. आतापर्यंत रोखलेले हे बालविवाह पोलीस, बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन आणि छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानने रोखले आहेत.

कोरोनाच्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बालविवाह वाढले

कोरोनाकाळात अनेकांनी चोरून विवाह लावले. त्याची शासन दप्तरी नोंदही झाली नाही. ज्यांनी तक्रारी केल्या असे ६८ बालविवाह रोखण्यात आले. परिस्थिती, मुलींची असुरक्षितता, रोजगार, आदी कारणे याला होती. त्यामुळेच बालविवाह वाढत असल्याचे मत बालकल्याण समितीचे तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.

१३ सदस्यांची बालसंरक्षक समित्या पाहतात काम

बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात ९५० बालसंरक्षक समित्या आहेत. यात मुख्याध्यापक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी, १२ ते १८ वर्षांमधील मुलगा व मुलगी, शालेय समितीचा अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवक असे विविध पदाधिकारी या समितीत असतात.

बालविवाह कायदा काय आहे?

मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करणे बंधनकारक आहे. त्या आगोदर विवाह लावल्यास तो गुन्हा ठरतो. यात शिक्षेसह एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. याबाबत शासनस्तरावरून वारंवार जनजागृती केली जात आहे.

आमच्याकडे तक्रार आली की प्रशासन व पोलिसांना माहिती देऊन तत्काळ गावात जातो. वयाचा दाखला तपासून खात्री केली जाते. वधू व वराच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून नोटीस बजावली जाते. तरीही एखाद्याने विवाह लावल्यास कारवाई केली जाते. याबाबत जनजागृतीही केली जात आहे.

- तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य बीड