शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बालविवाह; मुलांना बोहल्यावर चढविण्यात बीड राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल घेतल्याने तब्बल ६८ बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि संस्थांना यश आले आहे. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. परभणीत सर्वाधिक ४८ टक्के बालविवाहाचे प्रमाण असून, त्यापाठोपाठ बीडचे ४३.७ टक्के आहे. हे बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन, संस्थांनी आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.

मुलीचे वय १८, तर मुलाचे २१ पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाह लावावा, असा नियम आहे. परंतु ग्रामीण भागात आजही लोक अल्पवयीन मुलांनाच बोहल्यावर चढवत असल्याचे दिसते. शासन, संस्थांकडून जनजागृती होत असल्याने लोक तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी आजही लोकांची मानसिकता बदललेली नसून, बालविवाहाचे प्रमाण वाढतच चालल्याचे दिसते. आतापर्यंत रोखलेले हे बालविवाह पोलीस, बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन आणि छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानने रोखले आहेत.

कोरोनाच्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बालविवाह वाढले

कोरोनाकाळात अनेकांनी चोरून विवाह लावले. त्याची शासन दप्तरी नोंदही झाली नाही. ज्यांनी तक्रारी केल्या असे ६८ बालविवाह रोखण्यात आले. परिस्थिती, मुलींची असुरक्षितता, रोजगार, आदी कारणे याला होती. त्यामुळेच बालविवाह वाढत असल्याचे मत बालकल्याण समितीचे तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.

१३ सदस्यांची बालसंरक्षक समित्या पाहतात काम

बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात ९५० बालसंरक्षक समित्या आहेत. यात मुख्याध्यापक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी, १२ ते १८ वर्षांमधील मुलगा व मुलगी, शालेय समितीचा अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवक असे विविध पदाधिकारी या समितीत असतात.

बालविवाह कायदा काय आहे?

मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करणे बंधनकारक आहे. त्या आगोदर विवाह लावल्यास तो गुन्हा ठरतो. यात शिक्षेसह एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. याबाबत शासनस्तरावरून वारंवार जनजागृती केली जात आहे.

आमच्याकडे तक्रार आली की प्रशासन व पोलिसांना माहिती देऊन तत्काळ गावात जातो. वयाचा दाखला तपासून खात्री केली जाते. वधू व वराच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून नोटीस बजावली जाते. तरीही एखाद्याने विवाह लावल्यास कारवाई केली जाते. याबाबत जनजागृतीही केली जात आहे.

- तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य बीड