शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह; मुलांना बोहल्यावर चढविण्यात बीड राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल घेतल्याने तब्बल ६८ बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि संस्थांना यश आले आहे. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. परभणीत सर्वाधिक ४८ टक्के बालविवाहाचे प्रमाण असून, त्यापाठोपाठ बीडचे ४३.७ टक्के आहे. हे बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन, संस्थांनी आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.

मुलीचे वय १८, तर मुलाचे २१ पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाह लावावा, असा नियम आहे. परंतु ग्रामीण भागात आजही लोक अल्पवयीन मुलांनाच बोहल्यावर चढवत असल्याचे दिसते. शासन, संस्थांकडून जनजागृती होत असल्याने लोक तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी आजही लोकांची मानसिकता बदललेली नसून, बालविवाहाचे प्रमाण वाढतच चालल्याचे दिसते. आतापर्यंत रोखलेले हे बालविवाह पोलीस, बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन आणि छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानने रोखले आहेत.

कोरोनाच्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बालविवाह वाढले

कोरोनाकाळात अनेकांनी चोरून विवाह लावले. त्याची शासन दप्तरी नोंदही झाली नाही. ज्यांनी तक्रारी केल्या असे ६८ बालविवाह रोखण्यात आले. परिस्थिती, मुलींची असुरक्षितता, रोजगार, आदी कारणे याला होती. त्यामुळेच बालविवाह वाढत असल्याचे मत बालकल्याण समितीचे तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.

१३ सदस्यांची बालसंरक्षक समित्या पाहतात काम

बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात ९५० बालसंरक्षक समित्या आहेत. यात मुख्याध्यापक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी, १२ ते १८ वर्षांमधील मुलगा व मुलगी, शालेय समितीचा अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवक असे विविध पदाधिकारी या समितीत असतात.

बालविवाह कायदा काय आहे?

मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करणे बंधनकारक आहे. त्या आगोदर विवाह लावल्यास तो गुन्हा ठरतो. यात शिक्षेसह एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. याबाबत शासनस्तरावरून वारंवार जनजागृती केली जात आहे.

आमच्याकडे तक्रार आली की प्रशासन व पोलिसांना माहिती देऊन तत्काळ गावात जातो. वयाचा दाखला तपासून खात्री केली जाते. वधू व वराच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून नोटीस बजावली जाते. तरीही एखाद्याने विवाह लावल्यास कारवाई केली जाते. याबाबत जनजागृतीही केली जात आहे.

- तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य बीड