शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

उसाच्या फडात विजेच्या शॉकने मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST

जातेगाव : गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी शिवारात शनिवारी झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नसून, त्याचा जुन्या भांडणातून विजेचा करंट ...

जातेगाव : गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी शिवारात शनिवारी झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नसून, त्याचा जुन्या भांडणातून विजेचा करंट देऊन खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, सोमवारी तलवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भेंड टाकळी शिवारात शनिवार (ता. ७) रोजी संदीप सोपान चव्हाण (वय १५) या विद्यार्थ्याचा शेजारील किशोर लोंढे यांच्या ऊस फडात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. वन्य प्राण्यांकडून उसाची नासाडी होत असल्याने भेंड टाकळी येथील शेतकरी लोंढे यांनी ऊस फडाच्या चोहोबाजूने तारेचा विळखा घालून रात्री दररोज या तारेत वीज प्रवाह सोडण्यात येत होता, अशी माहिती मिळाली. संदीप चव्हाण यास ऊस खायचा मोह झाल्यावर तो ऊस फडात ऊस मोडत असतानाच त्याचा तारेला स्पर्श होताच, विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला, परंतु घटना बांधाच्या कडेला घडली असताना संदीपचा मृतदेह पन्नास फूट अंतरावर पाचरटात झाकून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्याने, हा अपघात नसून त्याचा घात झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबीयांना आला, शिवाय रोज रात्री वीज प्रवाह सोडण्यात येत होता. शनिवारी मात्र सायंकाळी लवकरच सोडला, असे बोलले जात होते.

दरम्यान, सोपान चव्हाण आणि किशोर लोंढे यांच्या शेत बांधाला बांध असल्यामुळे बांध कोरण्यावरून या दोघांत नेहमीच कुरबुरी होत असत. याचा राग धरून संदीप चव्हाण याचा विजेचा धक्का देऊन खून केल्याचा आरोप राजेंद्र बंकट चव्हाण यांनी फिर्यादीत केला आहे. त्यानुसार, तलवाडा पोलीस ठाण्यात किशोर विठ्ठल लोंढे, भगवान विठ्ठल लोंढे, आकाश भगवान लोंढे, बाळू बळीराम लोंढे आणि सोमनाथ भगवान लोंढे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने अधिक तपास करीत आहेत.