शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

उसाच्या फडात विजेच्या शॉकने मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST

जातेगाव : गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी शिवारात शनिवारी झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नसून, त्याचा जुन्या भांडणातून विजेचा करंट ...

जातेगाव : गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी शिवारात शनिवारी झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नसून, त्याचा जुन्या भांडणातून विजेचा करंट देऊन खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, सोमवारी तलवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भेंड टाकळी शिवारात शनिवार (ता. ७) रोजी संदीप सोपान चव्हाण (वय १५) या विद्यार्थ्याचा शेजारील किशोर लोंढे यांच्या ऊस फडात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. वन्य प्राण्यांकडून उसाची नासाडी होत असल्याने भेंड टाकळी येथील शेतकरी लोंढे यांनी ऊस फडाच्या चोहोबाजूने तारेचा विळखा घालून रात्री दररोज या तारेत वीज प्रवाह सोडण्यात येत होता, अशी माहिती मिळाली. संदीप चव्हाण यास ऊस खायचा मोह झाल्यावर तो ऊस फडात ऊस मोडत असतानाच त्याचा तारेला स्पर्श होताच, विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला, परंतु घटना बांधाच्या कडेला घडली असताना संदीपचा मृतदेह पन्नास फूट अंतरावर पाचरटात झाकून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्याने, हा अपघात नसून त्याचा घात झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबीयांना आला, शिवाय रोज रात्री वीज प्रवाह सोडण्यात येत होता. शनिवारी मात्र सायंकाळी लवकरच सोडला, असे बोलले जात होते.

दरम्यान, सोपान चव्हाण आणि किशोर लोंढे यांच्या शेत बांधाला बांध असल्यामुळे बांध कोरण्यावरून या दोघांत नेहमीच कुरबुरी होत असत. याचा राग धरून संदीप चव्हाण याचा विजेचा धक्का देऊन खून केल्याचा आरोप राजेंद्र बंकट चव्हाण यांनी फिर्यादीत केला आहे. त्यानुसार, तलवाडा पोलीस ठाण्यात किशोर विठ्ठल लोंढे, भगवान विठ्ठल लोंढे, आकाश भगवान लोंढे, बाळू बळीराम लोंढे आणि सोमनाथ भगवान लोंढे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने अधिक तपास करीत आहेत.