शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अकरावी परीक्षेसाठी सीईटीचा विचार; अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:34 IST

बीड : मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूचा संसर्गामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा ...

बीड : मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूचा संसर्गामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेश कसे द्यायचे यावर काथ्याकूट सुरू आहे. या प्रवेशासाठी सीईटीचा विचार केला जात आहे. अकरावी, तंत्रनिकेतन, आयटीआय व तत्सम प्रवेशासाठी कोणते निकष लावायचे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतील की नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. बीड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. दुसऱ्या लाटेशी सामना करतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. मार्च २०२० पासून ते आतापर्यंतचा शैक्षणिक वर्षाचा कालवधीत कोरोनामुळे अस्थिर वातावरणात गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन तसेच कलचाचणी झालेली नाही. परिणामी क्षमता तपासता आलेली नाही. त्यामुळे सीईटी कशा पद्धतीने घेता येईल, यावर विचारमंथन सुरू असले तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र अकरावीच्या प्रवेशाबाबत संभ्रमच आहे.

तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?

दहावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर तसेच त्यावरून विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये त्यांना प्रवेश मिळतो. अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय असला तरी तंत्रनिकेतन आणि आयटीआय प्रवेशासाठी निकषात बदल करावे लागतील का? याचा विचार गरजेचा आहे.

ऑनलाइन सीइटी झाली तर ग्रामीण भागाचे काय?

अकरावी प्रवेशासाठी सीईटी ऑनलाइन झाली तर या परीक्षेत सगळेच विद्यार्थी सहभागी होतील अशी स्थिती सध्या तरी नाही. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या उद्रेकजन्यस्थिती तसेच तांत्रिक अडचणी पाहता तेथील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतील की नाही? हाही प्रश्नच आहे.

ऑफलाइन सीईटी झाली तर कोरोनाचा धोका

कोरोनामुळे संकटजन्य स्थितीत ऑनलाइन सीईटी होण्याची शक्यता कमी मानली जाते. त्यात कोरोनाची तिसरी लाट भीती निर्माण करत आहे. धोका होण्याची शक्यता ऑफलाइन सीईटी अशक्य मानले जात आहे.

अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे?

दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ज्या शाखेत जायचे आहे तेथील प्रवेश मर्यादित आहेत. विद्यार्थ्यांची पात्रता, आवड आणि त्यांचा कल हे जाणून घेतला तर त्यांचे मूल्यमापन होईल यासाठी सीईटीसारखे परीक्षा महत्त्वाची मानली जाते.

दोन, भाषा विज्ञान आणि गणित समाजशास्त्र या पाच विषयांच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता येईल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

------------------

अकरावी परीक्षेसाठी सीईटी घ्यायला पाहिजे. कला, विज्ञान, वाणिज्य किंवा इतर कोणत्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल समजेल. किमान ५० ते १० गुणांची ऑनलाइन सीईटी घ्यावी. एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठराविक कालावधी व वेळापत्रक ठरवून शाळांकडे त्याचे नियोजन दिल्यास हे शक्य आहे.

- प्रा. चंद्रकांत मुळे, जिल्हा चिटणीस, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, बीड.

--------------

दहावीचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने अकरावीसाठी सीईटी असायल्या हव्यात. त्याशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी समजणार? सीईटी झाल्यास मिळणाऱ्या निकालावरून पुढील मार्ग पालकांना निश्चित करता येईल. शैक्षणिक वाटचालीतील अपघात टळतील.

- प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य, बीड.

----

सर्वच दहावीचे विद्यार्थी व पालक हे कोविड परिस्थितीमुळे तणावग्रस्त असल्याने ११ वी, तसेच आयटीआय, तंत्रनिकेतनचे प्रवेश हे दहावीच्या गुणांच्या आधारे दिले जावेत, या प्रवेशाला सीईटी नको. मागील वर्षी बारावीच्या सीईटीला ३० टक्के विद्यार्थी कोविड परिस्थितीमुळे गैरहजर होते. हे विद्यार्थी तर दहावीचे आहेत आणि जर ते सीईटीला गैरहजर राहिले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

- प्रा. राहुल खडके, प्राचार्य, आदित्य पॉलिटेक्निक, बीड

------

अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा १५,६००

जिल्ह्यातील महाविद्यालये १७०

बीड शहरातील एकूण जागा २५००

------