शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

बीड : कोरोनामुळे लोक घरातच बसले. त्यामुळे बाहेर फिरून व्यायाम करायची सवयच अनेकांची मोडली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत ...

बीड : कोरोनामुळे लोक घरातच बसले. त्यामुळे बाहेर फिरून व्यायाम करायची सवयच अनेकांची मोडली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. चालायचे बंद झाल्याने गुडघा, कंबरदुखी सारखे आजार वाढले आहेत. यात तरुणांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहिले तरी व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मागील दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात कोरोनाने आगमन केले. हा आजार संसर्गजन्य असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी लोकांना घरातच बसण्याचे आवाहन केले. त्यामुळे वॉकिंग, व्यायाम, खेळणे आदी सवय मोडल्या आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. घरातच बसून राहिल्याने अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता या सवयी पुन्हा लावून घेण्याची गरज आहे. यामुळे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल, असेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. एकाच जागेवर राहिल्याने आणि न चालल्यास हाडांचे आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

या कारणांसाठीच होतेय चालणे

ज्येष्ठ -व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ

महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षामिळेपर्यंत

पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली

तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत

--

हे करून पाहा

एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा.

कुठलेही काम करताना सहकाऱ्यांची मदत कमीत कमी घ्या.

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.

---

म्हणून वाढले हाडांचे आजार...

चालणे कमी झाल्याने अनेकांची शरीर लठ्ठ झाले आहे. तसेच हाडांचा ठिसूळपणा, संधिवात यांसारखे हाडांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमित फिजिओथेरपी करणे गरजेचे आहे.

---

ज्यांना चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी....

जे लोक वृद्ध आहेत; अथवा वेगवेगळ्या कारणास्तव चालूच शकत नाहीत, त्यांनी बसल्या जागेवर व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यात पाय हलवणे, हात हालवणे, मान हालवणे तसेच कॅल्शियमयुक्त आहार घेण्याची गरज आहे.

---

चालण्याची सवय मोडल्याने गुडघादुखी, कंबरदुखीसारखे आजार वाढतात. त्यामुळे नियमित व्यायाम व चालण्याची गरज आहे. ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांनीही बसल्या जागेवर व्यायाम करून पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.

डॉ. अमित बायस, अस्थिरोगतज्ज्ञ, बीड

230921\23_2_bed_10_23092021_14.jpeg

डॉ.अमित बायस