शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

बीड : कोरोनामुळे लोक घरातच बसले. त्यामुळे बाहेर फिरून व्यायाम करायची सवयच अनेकांची मोडली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत ...

बीड : कोरोनामुळे लोक घरातच बसले. त्यामुळे बाहेर फिरून व्यायाम करायची सवयच अनेकांची मोडली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. चालायचे बंद झाल्याने गुडघा, कंबरदुखी सारखे आजार वाढले आहेत. यात तरुणांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहिले तरी व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मागील दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात कोरोनाने आगमन केले. हा आजार संसर्गजन्य असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी लोकांना घरातच बसण्याचे आवाहन केले. त्यामुळे वॉकिंग, व्यायाम, खेळणे आदी सवय मोडल्या आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. घरातच बसून राहिल्याने अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता या सवयी पुन्हा लावून घेण्याची गरज आहे. यामुळे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल, असेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. एकाच जागेवर राहिल्याने आणि न चालल्यास हाडांचे आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

या कारणांसाठीच होतेय चालणे

ज्येष्ठ -व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ

महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षामिळेपर्यंत

पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली

तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत

--

हे करून पाहा

एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा.

कुठलेही काम करताना सहकाऱ्यांची मदत कमीत कमी घ्या.

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.

---

म्हणून वाढले हाडांचे आजार...

चालणे कमी झाल्याने अनेकांची शरीर लठ्ठ झाले आहे. तसेच हाडांचा ठिसूळपणा, संधिवात यांसारखे हाडांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमित फिजिओथेरपी करणे गरजेचे आहे.

---

ज्यांना चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी....

जे लोक वृद्ध आहेत; अथवा वेगवेगळ्या कारणास्तव चालूच शकत नाहीत, त्यांनी बसल्या जागेवर व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यात पाय हलवणे, हात हालवणे, मान हालवणे तसेच कॅल्शियमयुक्त आहार घेण्याची गरज आहे.

---

चालण्याची सवय मोडल्याने गुडघादुखी, कंबरदुखीसारखे आजार वाढतात. त्यामुळे नियमित व्यायाम व चालण्याची गरज आहे. ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांनीही बसल्या जागेवर व्यायाम करून पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.

डॉ. अमित बायस, अस्थिरोगतज्ज्ञ, बीड

230921\23_2_bed_10_23092021_14.jpeg

डॉ.अमित बायस