शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

पांढऱ्या दुधावर पडली कोरोनाची काळी छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:30 IST

शिरूर कासार : शेतीला जोडधंदा देत प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. ...

शिरूर कासार :

शेतीला जोडधंदा देत प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुधाला मिळणारा भाव आणि चारा, खुराक ,औषधी याचा खर्च जमा धरता जुळवाजुळव होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. पांढऱ्या दुधावरही कोरोनाची काळी छाया पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरुर कासार तालुक्यातील शेतकरी शहरात दररोज सकाळी दूध घ्या दूध, दूधवाला अशी आरोळी मारून घरोघरी रतीब लावून चहासाठी हॉटेल चालकाला दूध पुरवितात. वार्णी, कान्होबाचीवाडी, कोळवाडी, झापेवाडी, दहिवंडी, राक्षसभुवन, आनंदगाव, भालगावसह इतर गावातून दोनशेच्या आसपास शेतकरी दूध शहरात आणतात. या जोड धंद्यालाच आता मंदीचे दिवस आले. दुभत्या जनावरांच्या वाढत्या किमती, त्यांना चारा, खुराक देतांना करावी लागणारी कसरत याचा ताळमेळ लागत नाही. या जोडधंद्यात केवळ शेणाचाच वास शिल्लक राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शेती ही सतत निसर्गाच्या कोपाला बळी पडते. हाता तोंडासी आलेला घास देखील हिरावला जातो. हे अंगवळणी पडले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चांगला होता, मात्र आता परिस्थिती कठिण बनली आहे. दूध संकलन केंद्रावर डिग्री फॅटप्रमाणे २५ रुपये प्रती लीटर भाव मिळतो. त्यात आता आणखी चार रुपयांनी भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे. यावर उपाय म्हणून घरगुती रतीब व हाॅटेलमधे दूध पाहून भाव मिळतो. यात शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे मिळतात. मात्र हे पैसे उधारीवर असतात. आता लॉकडाऊनमुळे हॉटल बंद झाले असून, कोरोनाच्या संकटामुळे बाहेरील व्यक्तीचे दूधही शहरातील नागरिक घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावर घेण्यापासून सांभाळावे लागते. पर्यायाने भांडवली खर्च, गुंतवणुकीचा विचार केला असता, अधिक प्रमाणात नफा मिळत नाही. यातच हे संकट आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोट,

दोन वर्षांपासून मंदीचे सावट

गेल्या दोन वर्षांपासून दूध व्यवसायावर मंदीचे सावट आहे. मागील उन्हाळ्यात कोरोना आल्याने लस्सी, ताक, आइस्क्रिम आदी दुग्धजन्य पदार्थांचा खप न झाल्यामुळे दुधाचे भाव घसरले. आता कुठे जानेवारीपासून सुरुवात झाली होती. त्यात पुन्हा लाॅकडाऊनमुळे हा उन्हाळी हंगाम देखील जात आहे. दुग्ध व्यवसाय हा मोठा आर्थिक विषय असल्याने शासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे अन्यथा शेतकऱ्याचा कणाच मोडेल. पशुखाद्य विक्रेत्यावर नियंत्रण असावे अशी प्रतिक्रिया घोगस पारगावचे सरपंच तथा दूध संकलन करणारे देवा गर्कळ यांनी दिली.