शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मधमाशी पालन शेतीपूरक व्यवसाय म्हणून करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : मधमाशी पालन सध्या काळाची गरज आहे. कारण पृथ्वीवरून मधमाशांचा नायनाट झाला तर काही वर्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : मधमाशी पालन सध्या काळाची गरज आहे. कारण पृथ्वीवरून मधमाशांचा नायनाट झाला तर काही वर्षात मानवी जीवनसुद्धा धोक्यात येईल. त्यासाठी मधमाशी पालन हा एक शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जोपासला पहिजे, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र प्रा. पुष्पक बोथीकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

कृषी विज्ञान केंद्र, खामगाव आयोजित शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालन या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण मंगळवारी पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पुष्पक बोथीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, मधमाशीपासून तयार होणाऱ्या पदार्थाचा मानवी जीवनात खूप मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे मधमाशीमुळे पिकामध्ये परागीकरण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्येसुद्धा १५-२० टक्के वाढ होते. त्यानंतर रासायनिक कीटनाशकांचा अतिरिक्त वापर करणे टाळावे. कारण कीटकनाशकामुळे मधमाशांचा मोठ्या प्रमाणत ऱ्हास होत आहे.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हनुमान गरुड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक प्रा. किशोर जगताप व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.