शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

सावधान! १५३ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

दोन महिन्यांचा अहवाल : कोरोनाचे कारण सांगत पाणी नमुने पाठविण्यास अनुत्सुकता लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून ...

दोन महिन्यांचा अहवाल : कोरोनाचे कारण सांगत पाणी नमुने पाठविण्यास अनुत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणी साठ्यातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातात. ११ पैकी ७ तालुक्यांनी नमुनेच पाठविलेले नाहीत; परंतु ज्या चार तालुक्यांतील ८३५ पाणी नमुने आले, त्यापैकी तब्बल १५३ नमुने दूषित आढळले आहेत. मे व जून महिन्यातील हा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून मिळाला आहे. यावरून पिण्याचे पाणीच आजाराचे कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना उपाययोजनांमध्ये आरोग्य विभाग व्यस्त झाला. त्यामुळे पिण्याचे पाणी नमुने घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. नमुन्यांची संख्या तर घटलीच, शिवाय ज्यांनी पाठविले त्यांचा दूषित येण्याचा आकडाही मोठा आहे. ग्रामीण भागातून ४७७ नमुने घेतले असून, त्यात १३१ दूषित आढळले आहेत, तसेच शहरी भागातून ३५८ नमुने घेतले असून, २२ दूषित आढळले आहेत. त्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रयोगशाळेत रासायनिक सहायक करुणा गायकवाड, एस.एम. पोपळघट, आर.व्ही. वाघमारे, के.टी. जाधव, एम.आर. गायकवाड, बी.एल. दखणे ही टीम काम करते.

११ पैकी ७ तालुक्यांची कामात कुचराई

कसलेही कारण न सांगता प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकांनी गावात जाऊन पिण्याचे पाणी असलेल्या सार्वजनिक पाणी साठ्यांचे नमुने प्रयोशाळेत पाठविणे बंधनकारक आहे.

असे असले तरी आरोग्य सहायक व इतर कर्मचारी कुचराई करतात. ११ पैकी सात तालुक्यांतून मागील दोन महिन्यांत पाणी नमुने पाठविण्यास कुचराई झाल्याचे उघड झाले आहे.

यात माजलगाव, आष्टी, धारूर, परळी, शिरूर, पाटोदा आणि वडवणी तालुक्यांचा समावेश आहे. येथील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

या आरोग्य केंद्रांना पत्र

ज्या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविले नाहीत, अशांना प्रयोगशाळेकडून पत्र काढण्यात आले आहे. यात राजुरी, साक्षाळपिंपरी, चकलांबा, उमापूर, सादोळा, पात्रूड, किटीआडगाव, टाकरवण, गंगामसला, धामणगाव, कडा, सु. देवळा, खुंटेफळ, टाकळसिंग, भोगलवाडी, मोहखेड, पोहनेर, धर्मापुरी, नागापूर, सिरसाळा, मोहा, खालापुरी, शिरूर का., नायगाव, वाहली, डोंगरकिन्ही, अंमळनेर, आपेगाव, भावठाणा, कुप्पा या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविलेले नाहीत. येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच सामान्य जनता दूषित पाणी पित असल्याचे दिसते.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !

साथरोग व जलजन्य आजारापासून बचावासाठी पाणी उकळून पिण्याची गरज आहे.

पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची काळजी घेऊन ते वाहते करावे.

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच तत्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन उपचार करून घ्यावेत.

ज्या आरोग्य केंद्रांतर्गत गावातील पाणी नमुने गेले नाहीत, त्यांना तत्काळ सूचना केल्या जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार म्हणाले.

कोरोनामुळे पाणी नमुने येण्याची संख्या घटली आहे. पाणी नमुने पाठविण्यास उशीर झाल्यास तत्काळ पत्र काढले जाते, तसेच दूषित पाणी नमुन्यांची माहिती मेलद्वारे कळवून उपाययोजना करण्यास सांगितले जात असल्याचे वरिष्ठ रासायनिक सहायक करुणा गायकवाड म्हणाल्या.

120721\210412_2_bed_14_12072021_14.jpeg

जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुणे तपासणी करताना पथक दिसत आहे.