शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पीक कर्जासाठी बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : राज्याच्या महसूल विभागाने आपल्या संकेतस्थळावर ५२ बँकांशी करार केला आहे. आता या बँकांतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : राज्याच्या महसूल विभागाने आपल्या संकेतस्थळावर ५२ बँकांशी करार केला आहे. आता या बँकांतून डिजिटल स्वाक्षरीने सातबारा उतारा, आठ ‘अ’ व फेरफार ऑनलाईन पद्धतीने बँकेत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांकडे सातबारा व आठ ‘अ’ मागू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे एका निवदेनाद्वारे केली आहे.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत सर्व बँका, खासगी बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा या करारात समावेश आहे. सध्या २०२१ खरीप पीककर्ज वाटप चालू आहे. त्यासाठी तलाठ्याची स्वाक्षरी असलेला सातबारा, आठ ‘अ’ व फेरफारची मागणी बँका शेतकऱ्यांकडे करीत आहेत. बँकेला संकेतस्थळावर हे सर्व शासनाने उपलब्ध करून दिले आहे. तरी बँका शेतकऱ्यांना तलाठ्याकडे असे उतारे आणण्यास भाग पाडत आहेत. एकतर तलाठी मुख्यालयी कधीच नसतात. त्यासाठी त्यांनी खासगी सहाय्यक ठेवले आहेत. खासगी सहाय्यक शेतकऱ्यांकडून तोंड पाहून मनमानी रक्कम घेतात. यात शेतकरी भरडला जात आहे. काहींना फेरफारसाठी तहसीलला जावे लागते. तरी बँकांना दिलेल्या संकेतस्थळावरून कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा. याबाबत बँकांना सक्त सूचना करण्यात यावी. यामुळे महसूल विभागाचा कामाचा ताण कमी होईल. शेतकऱ्यांची आर्थिक बचत होईल. तरी आपण तत्काळ कार्यवाही करावी. नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.