शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

वय वाढीतील १९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीस टाळाटाळ; न्यायालयाच्या निर्णयाचा शासनाकडून अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 18:26 IST

, काही ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी २०१८ साली एक शासन निर्णय निर्गमित करून वय ६० वर्ष केले. शासन यावरच थांबले नाही तर पुन्हा आणखी यात २ वर्षाने वाढ करत ६२ केले.

- सोमनाथ खताळबीड : आरोग्य विभागातील ठराविक लोकांच्या हितासाठी सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६२ केले. हे नियमबाह्य असल्याचा निर्णय उच्च व सर्वोच्च न्यायालय आणि मॅटने दिला आहे. असे असतानाही शासनाकडून वय वाढीतील १९३ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ केली जात आहे. शासन न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत असल्याचे दिसत असून, अधिकाऱ्यांच्या सर्व संघटना शासनाविरोधात एकवटल्या आहेत. याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष आहे. परंतु, काही ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी २०१८ साली एक शासन निर्णय निर्गमित करून वय ६० वर्ष केले. शासन यावरच थांबले नाही तर पुन्हा आणखी यात २ वर्षाने वाढ करत ६२ केले. याला बीडच्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आव्हान देत उच्च न्यायायात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा निर्णय नियमबाह्य असल्याचे मत नोंदविले. यावर ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तसेच मॅटनेही निर्णय कायम ठेवत शासनाची कानउघडणी केली. या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून तत्काळ रिक्त पदे भरा, अन्यथा आरोग्य विभागाचेच आरोग्य धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली होती. असे असतानाही शासन या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता सर्वच संघटना एकत्र आल्या असून, १८ जानेवारी रोजी आरोग्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिले आहे. या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून पात्र लोकांची पदोन्नती करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टाेपे हे बैठकीत असल्याचे स्वीय सहाय्यक काळे यांनी सांगितले. प्रधान सचिव डाॅ. प्रदीप व्यास व आयुक्त एन. रामास्वामी यांनी फोन घेतला नाही.

सर्वांना कार्यमुक्त करावे ११ वर्षांपासून वर्ग १ आहे. १८ जानेवारीला राज्यपाल, सचिव, आयुक्तांना भेटून निवेदन दिले. मार्गदर्शनासाठी फाईल पाठविल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना कार्यमुक्त करावे.- डॉ. प्रसाद भंडारी, सचिव विशेषतज्ज्ञ वर्ग १ संघटना

कठोर निर्णय घ्यावा लागेल शासन न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत आहे. वय वाढवून ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करावे म्हणून पत्र, निवेदने दिली. परंतु, काहीच कारवाई केली जात नाही. आता आम्हाला काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल.- डॉ. आर. बी. पवार, अध्यक्ष, डीएचओ संघटना, महाराष्ट्र

टॅग्स :State Governmentराज्य सरकारBeedबीड