शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत ८४ जागांसाठी ३३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ...

अविनाश कदम

आष्टी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत ८४ जागांसाठी ३३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३१९ उमेदवारी अर्ज पात्र तर १२ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. चार जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

आष्टी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्या असून, सरपंच पदाचे आरक्षण गुलदस्त्यात असल्याने निवडून येणाऱ्या सदस्यांपैकी कोणा एकाची सरपंच पदी वर्णी लागू शकते त्यामुळे आपण सरपंच होणार या आशेने अनेक उमेदवार रिंगणात उतरले असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. बंडाळी होण्याची शक्यता लक्षात घेत गावातील पुढारी बंडाळी होऊ नये यासाठी दिवस-रात्र मनधरणी करत आहेत.

बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दोन ते तीन पॅनल पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक

आष्टी तालुक्यातील हातोला, डोईठाण,

धनगरवाडी (डो), कऱ्हेवाडी, क-हेवडगाव,

सोलापुरवाडी, खुटेफळ पुंडी, पिंपळा, सुंबेवाडी,

धनगरवाडी (पिंपळा) व वटणवाडी आश्या एकूण १२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ८१ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी ३३१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छानणीत १२ अर्ज अवैध तर ३१९ अर्ज वैध ठरले आहेत. तर अर्ज मागे घेण्यासाठी ४ जानेवारी पर्यंत मुदत असून पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. - शारदा दळवी,

तहसीलदार आष्टी