शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

सकारात्मक विचारातून कुठल्याही संकटावर मात करता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

धारूर : जीवनात कितीही मोठे संकट आले तरी सकारात्मक व चांगल्या विचारांतून कुठल्याही संकटावर मात करता येते, असे प्रतिपादन ...

धारूर : जीवनात कितीही मोठे संकट आले तरी सकारात्मक व चांगल्या विचारांतून कुठल्याही संकटावर मात करता येते, असे प्रतिपादन प्रकाश महाराज साठे यांनी केले. येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरवर कोरोना रुग्णांसाठी आयोजित कीर्तन सेवेत त्यांनी प्रतिपादन केले.

कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे मोफत कीर्तन करतात. धारूर शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरवर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी साठे महाराज यांची आठवी कीर्तन सेवा होती. आपल्या कीर्तन सेवेत त्यांनी रुग्णांना मानसिकदृष्ट्या खंबीर करणारे विचार मांडले. राष्ट्रसंत तुकारामांचा अंभग कीर्तनासाठी घेतला. साठे म्हणाले, कोरोना संकट ही जागतिक महामारी आहे. या काळात विचार सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. आजार हा विचारांवर अवलंबून असतो. चांगले विचार ठेवल्यास सर्व परिस्थितीवर मात करता येते, असे ते म्हणाले. कीर्तनामध्ये चांगल्या विचाराचे टाॅनिक मिळते. जसे आपण विचार करतो, तसे घडत जाते. त्यामुळे चांगले विचार सतत करा. या कोरोना महामारीने कुणाचे कुणी नाही हे पुन्हा एकदा दाखविले आहे. संतांचे अभंग बरेच काही शिकवतात. त्यामुळे संतविचारांच्या मार्गावर चालत रहा, सकारात्मक विचार करा. यातूनच आपण या संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास त्यांनी दिला. साठे महाराज यांनी कीर्तन सेवेतून प्रबाेधनाबरोबरच श्रोत्यांचे मनोरंजन केले. कीर्तनसेवा यशस्वी करण्यासाठी नितीन शिनगारे, हर्षवर्धन अंडील, सुहास तपसे, ऋषीकेश ढगे, सुरेश शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. सर्व कोरोना रुग्णांनी या कीर्तनाचा लाभ घेतला.