शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

शेतकऱ्यांसाठी कोरोना महामारीत विशेष पॅकेज जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST

आष्टी : कोरोना महामारीत शेतकरी व शेतमजुरांना सरकारने विशेष आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम ...

आष्टी : कोरोना महामारीत शेतकरी व शेतमजुरांना सरकारने विशेष आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या कामगारांना एमआरईजीएसमधून पगार द्यावा, ही मागणी मागील पंचवीस वर्षांपासून असून, ही मागणी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षानेही केली आहे. आता त्यांची सत्ता आहे, त्यांनी ही मागणी पूर्ण करावी, असे आवाहन माजी आ. भीमसेन धोंडे यांनी केले. येथील पंडित जवाहर नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात मंगळवारी सांयकाळी पत्रकार परिषदेत माजी आ. धोंडे बोलत होते.

कोरोनाची महामारी वाढतच असून, आष्टी येथे ऑक्सिजन प्लांटची मंजुरी मिळाली असली तरी अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. लवकरात लवकर आष्टी येथील ऑक्सिजन प्लांटचे काम करतानाच शिरूर आणि पाटोदा येथेही ऑक्सिजन उभारण्याचा विचार व्हावा. आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे मोफत अँटिजन चाचणी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून, तत्काळ आवश्यक किट उपलब्ध करून गावेगावी अँटिजन चाचणी सुरू करावी आणि त्यासह लसीकरणही प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय करावे, अशी मागणीही माजी आ. भीमसेन धोंडे यांनी यावेळी केली. बऱ्याच दुकानदारांकडे मागील वर्षाचा खताचा साठा शिल्लक असून, तो मागील वर्षीच्याच भावात विक्री करावा, यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच आता पेरणीसाठी लागणारे बियाणेही सरकारने मागील वर्षाच्या भावातच द्यावे, अशी मागणी धोंडे यांनी केली.