शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

लातुरच्या सिंचनासाठी अंबाजोगाईकर वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर ...

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर जिल्ह्यात जावे. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील १० गावचा वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला आहे. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. लातुरच्या पाण्यासाठी अंबाजोगाई तालुक्याला वेठीस धरण्याचा हा अनोखा प्रकार इथल्या सिंचनासाठी त्रासदायक ठरू लागला आहे.

तालुक्यात पाटोदा शिवारात मांजरा धरणाच्या कालव्याचे पाणी पुढील शेतकऱ्यांना जावे म्हणून पाटबंधारे विभागाच्या सुचनेनुसार महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ज्यांचा कालव्याशी संबंधच नाही,अशा शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे. विहीर व इंधन विहिरीला पाणी असतानाही वीज पुरवठा बंद असल्याने ऊस वाळत असल्याची मोठी ओरड होत आहे. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय नुकसानदायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

दहा गावांमधील वीजपुरवठा ठप्प

मांजरा धरणातून सोडलेले पाणी पाणी पुढे लातुरकडे वेगाने वाहत जावे म्हणून धरणाच्या लाभक्षेत्रातील अकोला,धानोरा,आपेगाव,वांगदरी,इसळ, सौदंना,बनसरोळा, नायगाव,धनेगाव,आवाड शिरपुरा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणी सुटलेले असतानाही या गावांना या पाण्याचा लाभ घेता येईना.तर इतर शेतकऱ्यांना ही वीजपुरवठा खंडित झाल्याने विहिरींचे पाणी ही उसाला देता येईना.

वीजपुरवठा सुरळीत करा

वीजपुरवठा खंडित झाल्याने अंबाजोगाई व केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.लातुर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कॅनॉल वरील शेतीपंपाचे कनेक्शन कट करण्याचे आदेश त्वरीत रद्द करावेत तसेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी एका पत्राद्वारे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.