शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

लातुरच्या सिंचनासाठी अंबाजोगाईकर वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर ...

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर जिल्ह्यात जावे. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील १० गावचा वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला आहे. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. लातुरच्या पाण्यासाठी अंबाजोगाई तालुक्याला वेठीस धरण्याचा हा अनोखा प्रकार इथल्या सिंचनासाठी त्रासदायक ठरू लागला आहे.

तालुक्यात पाटोदा शिवारात मांजरा धरणाच्या कालव्याचे पाणी पुढील शेतकऱ्यांना जावे म्हणून पाटबंधारे विभागाच्या सुचनेनुसार महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ज्यांचा कालव्याशी संबंधच नाही,अशा शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे. विहीर व इंधन विहिरीला पाणी असतानाही वीज पुरवठा बंद असल्याने ऊस वाळत असल्याची मोठी ओरड होत आहे. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय नुकसानदायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

दहा गावांमधील वीजपुरवठा ठप्प

मांजरा धरणातून सोडलेले पाणी पाणी पुढे लातुरकडे वेगाने वाहत जावे म्हणून धरणाच्या लाभक्षेत्रातील अकोला,धानोरा,आपेगाव,वांगदरी,इसळ, सौदंना,बनसरोळा, नायगाव,धनेगाव,आवाड शिरपुरा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणी सुटलेले असतानाही या गावांना या पाण्याचा लाभ घेता येईना.तर इतर शेतकऱ्यांना ही वीजपुरवठा खंडित झाल्याने विहिरींचे पाणी ही उसाला देता येईना.

वीजपुरवठा सुरळीत करा

वीजपुरवठा खंडित झाल्याने अंबाजोगाई व केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.लातुर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कॅनॉल वरील शेतीपंपाचे कनेक्शन कट करण्याचे आदेश त्वरीत रद्द करावेत तसेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी एका पत्राद्वारे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.