शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

लातुरच्या सिंचनासाठी अंबाजोगाईकर वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर ...

: पाटबंधारे, महावितरणच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी पुढे सरकत लातुर जिल्ह्यात जावे. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील १० गावचा वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला आहे. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. लातुरच्या पाण्यासाठी अंबाजोगाई तालुक्याला वेठीस धरण्याचा हा अनोखा प्रकार इथल्या सिंचनासाठी त्रासदायक ठरू लागला आहे.

तालुक्यात पाटोदा शिवारात मांजरा धरणाच्या कालव्याचे पाणी पुढील शेतकऱ्यांना जावे म्हणून पाटबंधारे विभागाच्या सुचनेनुसार महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ज्यांचा कालव्याशी संबंधच नाही,अशा शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे. विहीर व इंधन विहिरीला पाणी असतानाही वीज पुरवठा बंद असल्याने ऊस वाळत असल्याची मोठी ओरड होत आहे. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय नुकसानदायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

दहा गावांमधील वीजपुरवठा ठप्प

मांजरा धरणातून सोडलेले पाणी पाणी पुढे लातुरकडे वेगाने वाहत जावे म्हणून धरणाच्या लाभक्षेत्रातील अकोला,धानोरा,आपेगाव,वांगदरी,इसळ, सौदंना,बनसरोळा, नायगाव,धनेगाव,आवाड शिरपुरा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणी सुटलेले असतानाही या गावांना या पाण्याचा लाभ घेता येईना.तर इतर शेतकऱ्यांना ही वीजपुरवठा खंडित झाल्याने विहिरींचे पाणी ही उसाला देता येईना.

वीजपुरवठा सुरळीत करा

वीजपुरवठा खंडित झाल्याने अंबाजोगाई व केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.लातुर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कॅनॉल वरील शेतीपंपाचे कनेक्शन कट करण्याचे आदेश त्वरीत रद्द करावेत तसेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी एका पत्राद्वारे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.