शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

चौसाळ्यात उन्नत भारत अभियान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:33 IST

बीड : उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावू शकतो व ते आपल्या परिसराचा विकास करु शकतात, ...

बीड : उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावू शकतो व ते आपल्या परिसराचा विकास करु शकतात, असे मत प्रा. सुधीर माने यांनी व्यक्त केले.

कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथे उन्नत भारत अभियाना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. माने बोलत होते.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपंगे हे उपस्थित होते.

प्रा. माने म्हणाले की, उन्नत भारत अभियान हे एक महत्त्वाचे अभियान असून त्यातून ग्रामीण लोकांच्या जीवनातील अनेक समस्याचे निराकारक होऊ शकते.

प्रास्ताविक उन्नत भारत अभियानाचे समन्वयक डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. त्यांनी या अभियानाचे महत्त्व विस्तारपूर्वक विशद केले. डॉ. विजय भटकर, आयटीआय, एनआयटी, एमएचआरडीसी दिल्ली, तांत्रिक, कृषि आणि सर्व अकृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून हे अभियान चालवले जाते.

चौसाळा परिसरातील पाच गावे दत्तक घेण्यात आली असून त्यांचा सर्व्हे करुन त्यांचा विकास कसा करता येईल याचेही काम या अभियानातून केले जाणार आहे, असे डॉ. लांडगे यांनी विशद केले. एकूणच उन्नत भारत अभियानाच्या संदर्भात अनेक बाबींचा उहापोह या कार्यशाळेत झाला.

आभार प्रा.डॉ. विश्‍वास कंधारे यांनी केले तर पाहूण्यांची ओळख प्रा.डॉ. सुधाकर वनवे यांनी केले. या प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.