शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

चौसाळ्यात उन्नत भारत अभियान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:33 IST

बीड : उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावू शकतो व ते आपल्या परिसराचा विकास करु शकतात, ...

बीड : उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावू शकतो व ते आपल्या परिसराचा विकास करु शकतात, असे मत प्रा. सुधीर माने यांनी व्यक्त केले.

कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथे उन्नत भारत अभियाना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. माने बोलत होते.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपंगे हे उपस्थित होते.

प्रा. माने म्हणाले की, उन्नत भारत अभियान हे एक महत्त्वाचे अभियान असून त्यातून ग्रामीण लोकांच्या जीवनातील अनेक समस्याचे निराकारक होऊ शकते.

प्रास्ताविक उन्नत भारत अभियानाचे समन्वयक डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. त्यांनी या अभियानाचे महत्त्व विस्तारपूर्वक विशद केले. डॉ. विजय भटकर, आयटीआय, एनआयटी, एमएचआरडीसी दिल्ली, तांत्रिक, कृषि आणि सर्व अकृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून हे अभियान चालवले जाते.

चौसाळा परिसरातील पाच गावे दत्तक घेण्यात आली असून त्यांचा सर्व्हे करुन त्यांचा विकास कसा करता येईल याचेही काम या अभियानातून केले जाणार आहे, असे डॉ. लांडगे यांनी विशद केले. एकूणच उन्नत भारत अभियानाच्या संदर्भात अनेक बाबींचा उहापोह या कार्यशाळेत झाला.

आभार प्रा.डॉ. विश्‍वास कंधारे यांनी केले तर पाहूण्यांची ओळख प्रा.डॉ. सुधाकर वनवे यांनी केले. या प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.