शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

आरोपी दाम्पत्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

बीड : करणी केल्याने म्हशीचा मृत्यू झाला, अशा संशयातून बदला घेण्यासाठी ६ वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना ३ फेब्रुवारी ...

बीड : करणी केल्याने म्हशीचा मृत्यू झाला, अशा संशयातून बदला घेण्यासाठी ६ वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी बीड तालुक्यातील रत्नागिरी येथे घडली होती. अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गावातील शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ या ६ वर्षांच्या बालकाचा खून गावातीलच रोहिदास सपकाळ व देवईबाई सपकाळ या दोघांनी केला. दरम्यान, ‘आमच्या म्हशीवर करणी केल्याने तिचा मृत्यू झाला, त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलाचा खून केला’ अशी कबुली मारेकऱ्यांनी दिली. दोन कुटुंबांत झालेल्या वादातून लहान मुलाचा खून झाल्याने सर्वत्र रोष होता. पोलिसांवरही आरोपी शोधण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. मात्र, नेकनूर ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह आढळलेल्या जागेचे अवलोकन करून, परिसरातील घरांचा व तेथील माणसांची सर्व पार्श्वभूमीची माहिती घेतली व आरोपी रोहिदास व देवईबाई या दोघांना अटक केली. दरम्यान, आरोपीने खून केल्याची कबुली दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. गुरुवारी गुन्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यांना शुक्रवारी बीड येथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.

ग्रामस्थांना बसला धक्का

रत्नागिरी येथील बालकाचा खून संशयातून केल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर ग्रामस्थांना धक्का बसला. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून लहान मुलाचा खून करणे हे वेदनादाई असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली, तसेच कठोर शिक्षा करण्याची मागणीही पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.