शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

नागापूरच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:36 IST

बीड : क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खून करण्यात आला. ही ...

बीड : क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना १७ मे रोजी रात्री ११ वाजेदरम्यान बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली. या प्रकरणी आरोपीला पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपी फरार झाला होता. आरोपीचा शोध पोलिसांनी लावला असून, १९ मे रोजी सकाळी नागापूर खुर्द येथील नदीजवळील एका पडक्या घरातून त्याला अटक केली आहे.

परमेश्वर साळुंके असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे आणि मृत राम साळुंके (वय ५०) व लक्ष्मण यांच्यात १५ दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी हा वाद गावातच मिटवण्यात आला होता; परंतु १७ मे रोजी परमेश्वर याने राम व लक्ष्मण साळुंके या दोघांना फोन करून झालेल्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ केली. त्यानंतर परमेश्वराला समजावण्यासाठी व शिवीगाळ केल्याचे त्याच्या आई-वडिलांना सांगण्यासाठी सोमवारी (दि. १७) रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके हे दोघे भाऊ त्याच्या घराकडे निघाले होते. दरम्यान, आपल्या घरी ते दोघे येणार असल्याची माहिती परमेश्वरला मिळाली. राम व लक्ष्मण साळुंके यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने परमेश्वर कुऱ्हाड घेऊन त्याच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसला होता. राम व लक्ष्मण साळुंके दिसताच परमेश्वर साळुंके याने त्यांच्यावर अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. या हल्ल्यात दोघेही जागीच गतप्राण झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. तोपर्यंत आरोपी परमेश्वर साळुंके त्या ठिकाणावरून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली होती. १९ मे रोजी सकाळी आरोपी परमेश्वर साळुंके याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप, पोलीस हवालदार सानप,तसेच खरमाटे, पो.ह.ना. सुरवसे, पो.शि. कानडे, कारले, जाधव व चांदणे यांनी केली.

आरोपी फरार होण्याच्या तयारीत

आरोपी परमेश्वर साळुंके हा खून केल्यानंतर रात्री गावातील नदीपात्रात लपण्यासाठी गेला होता. त्यानंतर तहान लागली म्हणून तो घरी पाणी पिण्यासाठी आला. त्यावेळी आईने विचारलं असं का केलंस तर, तिलादेखील धमकी दिली. तसेच दुचाकी सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु, गाडी सुरू झाली नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तो फरार होऊ नये यासाठी दुचाकीचा प्लग काढून घेतला. त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी १९ मे रोजी तो नदीपात्राजवळ असलेल्या एका पडक्या घरात पोलिसांना दिसला. लॉकडाऊनमुळे वाहने बंद आहेत; त्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न फसल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

आज करणार न्यायालयात हजर

आरोपीला आज, गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या खून प्रकरणामुळे मृताच्या कुटुंबीयांवर मोठा परिणाम झाला असून, गावात शोककळा पसरली आहे.