शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अबब, सव्वालाख लोकांना कोरोना झालेला समजलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST

बीड : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीनवेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील ४२१ लोकांचे रक्तनमुने ...

बीड : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीनवेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील ४२१ लोकांचे रक्तनमुने तपासले होते. याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला आहे. यात ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याचे प्रमाण २३.२८ टक्के एवढे आहे. यावरून सव्वालाख लोकांना कोरोना होऊन गेल्याचे उघड झाले आहे. यात ग्रामीणपेक्षा शहरांतील प्रमाण अधिक आहे.

आयसीएमआरच्या वतीने सेरो सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील बीडसह परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव हे सहा जिल्हे निवडले होते. २१ मे ते ३० मे दरम्यान पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान दुसरा टप्पा तर २३ ते २९ डिसेंबरदरम्यान तिसरा टप्पा पार पडला होता. या सर्वेक्षणात नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडीज तयार होत आहेत का, याचे संशोधन करण्यात आले. बीड जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात ४२१ लोकांचे रक्तनमुने तपासले होते. यावेळी आरोग्यकर्मींचीही निवड केली होती. यात ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी ही माहिती देण्यात आली.

लॉकडाऊन शिथील झाल्याने संख्या वाढली

पहिला व दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण झाले तेव्हा राज्यात सर्वत्र लॉकडाऊन होते. त्यामुळे समूहसंसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळेच पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याही नगण्य होती. परंतु, तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन शिथील झाले आणि संख्याही वाढली. यात समूहसंसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होते.

-----

तीन टप्प्यात काय आढळले?

पहिल्या टप्प्यात ४०० लोकांची चाचणी केली. यात ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण केवळ १ टक्का होते. दुसऱ्या टप्प्यात ४४३ लोकांची चाचणी केली. यात ३३ अहवाल पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण ७.४ टक्के एवढे होते. आणि आता तिसऱ्या टप्प्यात ४२१ लोकांची चाचणी केली. यात ९८ अहवाल पॉझिटिव्ह आले असून याचे प्रमाण २३.२८ टक्के एवढे आहे.

---

कोट - फोटो

आयसीएमआरच्या वतीने केलेल्या सेराे सर्व्हेचा तिसऱ्या टप्प्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ४२१ चाचण्यांमध्ये ९८ अहवाल पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण २३.२८ टक्के एवढे आहे. पहिल्या दोन टप्प्यात लाॅकडाऊन होते. तिसऱ्या टप्प्यात ते शिथील झाला आणि समूहसंसर्ग झाल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली. अजूनही नागरिकांनी गाफील न राहता कोरोनाबाबत काळजी घ्यावी.

डॉ. आर. बी. पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

----

तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारी

गाव चाचणीपॉझिटिव्ह टक्का

हिंगणी ४० ७१७.५०

पांगरी ४४ ६१३.६४

आमला ४० २५.००

टालेवाडी ४१ ८१९.५१

पिंपळनेर ४५ १० २२.२२

चंदनसावरगाव ४२ ९२१.४३

मोहा ४१ १३ ३१.७१

नंदनगाव ४५ ९२०.००

बीड प्र. २३ ४१ १८ ४३.९०

परळी प्र. ३० ४२ १६ ३८.१०

एकूण ४२१ ९८ २३.२८