शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

आंबिया बहार फळपीक योजनेचे ९०० कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST

जातेगाव : पुनर्रचित हवामान बदलानुसार फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षणासाठी राज्य सरकारने २०१९ - २०मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीसोबत ...

जातेगाव : पुनर्रचित हवामान बदलानुसार फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षणासाठी राज्य सरकारने २०१९ - २०मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीसोबत करार करून संत्री, मोसंबी, द्राक्ष, आंबा, काजू फळबागेसाठी आंबिया बहार पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या योजनेनुसार राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांनी रक्कम भरून विमा काढला. सप्टेंबर २०२०पर्यंत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण होते. हवामान बदलानुसार अनेक फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, याबाबत त्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे दावे दाखल केले. त्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनीने राज्यभरातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचा ९२५ कोटी रुपये विमा मंजूरही केला. परंतु अद्यापपर्यंत या विम्याची रक्कम संपूर्ण राज्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली नाही. केवळ राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यभरातील फळ उत्पादक फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे सव्वा नऊशे कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीकडे अडकून पडलेले आहेत. सरकारने त्यांच्या हिश्श्याचे ४२ कोटी रुपये तत्काळ विमा कंपनीकडे वर्ग करावेत आणि राज्यभरातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे सव्वा नऊशे कोटी रुपये तत्काळ अदा करावेत.

अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी दिला आहे.

राज्य सरकारने भरला नाही दुसरा हप्ता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे व स्वाभिमानीचे कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी तत्काळ भारतीय कृषी विमा कंपनीच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांशी संपर्क करून पाठपुरावा केला असता या विमा योजनेतील राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो दोन हप्त्यांमध्ये विमा कंपनीकडे वर्ग करणे अपेक्षित होते. राज्य सरकारने पहिला हप्ता २८४ कोटी रुपये ३ ऑगस्ट रोजी भारतीय कृषी विमा कंपनीकडे वर्ग केला. परंतु त्यानंतरचा दुसरा हप्ता फक्त ४२ कोटी रुपये दिलेला नाही. राज्य सरकार आणि विमा कंपनीच्या करारानुसार राज्य सरकारचा पूर्ण हप्ता विमा कंपनीकडे वर्ग केल्याशिवाय विमा कंपनी शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देऊ शकत नाही. दोन महिन्यांपूर्वीच भारतीय कृषी विमा कंपनीने महाराष्ट्राच्या राज्य कृषी आयुक्तांना याबाबत पत्रव्यवहारही केला आहे.