शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

रोजी गेली तरी ४० हजार कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

बीड : कोरोना संसर्ग वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार शासनाचा आहे, तर जिल्ह्यातदेखील अनेक निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे याचा ...

बीड : कोरोना संसर्ग वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार शासनाचा आहे, तर जिल्ह्यातदेखील अनेक निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे एकवेळ जेवणाचीदेखील गैरसोय झाली आहे; मात्र शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ बीड जिल्ह्यातील ४० हजार २८८ कुटुंबाला होणार आहे.

कोरोनामुळे पुणे, मुंबई व औरंगाबाद याठिकाणी असलेला बहुतांश कामगार वर्ग गावाकडे पुन्हा एकदा ग्रामीण भागाकडे येऊ लागला आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार गेला असला, तरी शासनाकडून मोफत धान्य देऊन आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. धान्य वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बैठक घेऊन पुरवठा विभागाला योग्य नियोजन करून धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामधून प्राधान्य कुटुंब व शेतकरी एपीएल या लाभार्थ्यांना मोफत धान्य योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना धान्य खरेदी करताना गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो या दराने खरेदी करावी लागणार आहे.

...

तालुकानिहाय संख्या

बीड ७७५२

आष्टी ३६२५

पाटोदा १९६७

गेवराई ५९१४

माजलगाव ३४१२

वडवणी १५१२

धारूर २९३६

केज २८४९

अंबाजोगाई ३१९३

परळी वैजिनाथ ५०८४

जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या

४०२८८

....

शासनाकडून मोफत धान्य दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. किमान दोन वेळचे जेवणे करण्याची चिंता मिटली आहे. यामुळे आमच्यासारख्या अनेक कुटुंबांची भूक भागणार आहे.

-गणेश थोरात.

................

लॉकडाऊनमुळे रोजगार गेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाकडून मोफत धान्याची व्यवस्था केली असली तरी, इतर संसार चालवण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तुसाठी पैसे लागतातच त्यामुळे रोजगार महत्त्वाचा आहे.

-बबन कांबळे.

............

रोजगार महत्त्वाचा असून, शासनाने लॉकडाऊन करू नये. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी; परंतु व्यवसाय सुरू ठेवावेत, त्यामुळे रोजगार मिळेल, याची व्यवस्था सरकारने करावी. धान्य दिल्यामुळे आधार मिळाला आहे; परंतु संसार चालवण्यासाठी पैसे लागतात.

-राजेश गालफाडे

...

हे धान्य मिळणार मोफत

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये ३५ किलो गहू व तांदूळ दिला जाणार आहे, तर यावेळी तुरीची डाळदेखील देण्यात येणार आहे. प्राधान्य कुुटुंब व एपीएल शेतकरी कार्डधारकांना मात्र पूर्वीप्रमाणे धान्याची खरेदी करावी लागणार आहे.