शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रोजी गेली तरी ४० हजार कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

बीड : कोरोना संसर्ग वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार शासनाचा आहे, तर जिल्ह्यातदेखील अनेक निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे याचा ...

बीड : कोरोना संसर्ग वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार शासनाचा आहे, तर जिल्ह्यातदेखील अनेक निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे एकवेळ जेवणाचीदेखील गैरसोय झाली आहे; मात्र शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ बीड जिल्ह्यातील ४० हजार २८८ कुटुंबाला होणार आहे.

कोरोनामुळे पुणे, मुंबई व औरंगाबाद याठिकाणी असलेला बहुतांश कामगार वर्ग गावाकडे पुन्हा एकदा ग्रामीण भागाकडे येऊ लागला आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार गेला असला, तरी शासनाकडून मोफत धान्य देऊन आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. धान्य वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बैठक घेऊन पुरवठा विभागाला योग्य नियोजन करून धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामधून प्राधान्य कुटुंब व शेतकरी एपीएल या लाभार्थ्यांना मोफत धान्य योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना धान्य खरेदी करताना गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो या दराने खरेदी करावी लागणार आहे.

...

तालुकानिहाय संख्या

बीड ७७५२

आष्टी ३६२५

पाटोदा १९६७

गेवराई ५९१४

माजलगाव ३४१२

वडवणी १५१२

धारूर २९३६

केज २८४९

अंबाजोगाई ३१९३

परळी वैजिनाथ ५०८४

जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या

४०२८८

....

शासनाकडून मोफत धान्य दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. किमान दोन वेळचे जेवणे करण्याची चिंता मिटली आहे. यामुळे आमच्यासारख्या अनेक कुटुंबांची भूक भागणार आहे.

-गणेश थोरात.

................

लॉकडाऊनमुळे रोजगार गेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाकडून मोफत धान्याची व्यवस्था केली असली तरी, इतर संसार चालवण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तुसाठी पैसे लागतातच त्यामुळे रोजगार महत्त्वाचा आहे.

-बबन कांबळे.

............

रोजगार महत्त्वाचा असून, शासनाने लॉकडाऊन करू नये. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी; परंतु व्यवसाय सुरू ठेवावेत, त्यामुळे रोजगार मिळेल, याची व्यवस्था सरकारने करावी. धान्य दिल्यामुळे आधार मिळाला आहे; परंतु संसार चालवण्यासाठी पैसे लागतात.

-राजेश गालफाडे

...

हे धान्य मिळणार मोफत

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये ३५ किलो गहू व तांदूळ दिला जाणार आहे, तर यावेळी तुरीची डाळदेखील देण्यात येणार आहे. प्राधान्य कुुटुंब व एपीएल शेतकरी कार्डधारकांना मात्र पूर्वीप्रमाणे धान्याची खरेदी करावी लागणार आहे.