शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

रोजी गेली तरी ४० हजार कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

बीड : कोरोना संसर्ग वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार शासनाचा आहे, तर जिल्ह्यातदेखील अनेक निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे याचा ...

बीड : कोरोना संसर्ग वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार शासनाचा आहे, तर जिल्ह्यातदेखील अनेक निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे एकवेळ जेवणाचीदेखील गैरसोय झाली आहे; मात्र शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ बीड जिल्ह्यातील ४० हजार २८८ कुटुंबाला होणार आहे.

कोरोनामुळे पुणे, मुंबई व औरंगाबाद याठिकाणी असलेला बहुतांश कामगार वर्ग गावाकडे पुन्हा एकदा ग्रामीण भागाकडे येऊ लागला आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार गेला असला, तरी शासनाकडून मोफत धान्य देऊन आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. धान्य वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बैठक घेऊन पुरवठा विभागाला योग्य नियोजन करून धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामधून प्राधान्य कुटुंब व शेतकरी एपीएल या लाभार्थ्यांना मोफत धान्य योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना धान्य खरेदी करताना गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो या दराने खरेदी करावी लागणार आहे.

...

तालुकानिहाय संख्या

बीड ७७५२

आष्टी ३६२५

पाटोदा १९६७

गेवराई ५९१४

माजलगाव ३४१२

वडवणी १५१२

धारूर २९३६

केज २८४९

अंबाजोगाई ३१९३

परळी वैजिनाथ ५०८४

जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या

४०२८८

....

शासनाकडून मोफत धान्य दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. किमान दोन वेळचे जेवणे करण्याची चिंता मिटली आहे. यामुळे आमच्यासारख्या अनेक कुटुंबांची भूक भागणार आहे.

-गणेश थोरात.

................

लॉकडाऊनमुळे रोजगार गेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाकडून मोफत धान्याची व्यवस्था केली असली तरी, इतर संसार चालवण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तुसाठी पैसे लागतातच त्यामुळे रोजगार महत्त्वाचा आहे.

-बबन कांबळे.

............

रोजगार महत्त्वाचा असून, शासनाने लॉकडाऊन करू नये. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी; परंतु व्यवसाय सुरू ठेवावेत, त्यामुळे रोजगार मिळेल, याची व्यवस्था सरकारने करावी. धान्य दिल्यामुळे आधार मिळाला आहे; परंतु संसार चालवण्यासाठी पैसे लागतात.

-राजेश गालफाडे

...

हे धान्य मिळणार मोफत

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये ३५ किलो गहू व तांदूळ दिला जाणार आहे, तर यावेळी तुरीची डाळदेखील देण्यात येणार आहे. प्राधान्य कुुटुंब व एपीएल शेतकरी कार्डधारकांना मात्र पूर्वीप्रमाणे धान्याची खरेदी करावी लागणार आहे.