शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

२२ भूखंड बोगस प्रक्रिया राबवून लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:32 IST

धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २२ भूखंड कोरोनाकाळामध्ये बोगस वाटप प्रक्रिया राबवून पदाधिकारी व संचालक मंडळाने ...

धारूर

: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २२ भूखंड कोरोनाकाळामध्ये बोगस वाटप प्रक्रिया राबवून पदाधिकारी व संचालक मंडळाने नातेवाइकांच्या नावे वाटून घेतल्याने ही प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी. नसता आंदोलनाचा इशारा संचालक चिंतामण सोळुंके यांनी पणन संचालकांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

धारूर मार्केट यार्डातील रिकामे २२ भूखंडवाटपाच्या ठरावाबाबत संचालक मंडळाच्या सभेत भूखंडवाटप करणे योग्य नसल्याने तसेच वाटप करायचे असल्यास जुन्या प्रलंबित मागणी अर्जाप्रमाणे व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आॕॅनलाइन पद्धतीने योग्य प्रसिद्धी देऊन पारदर्शक पद्धतीने जास्तीतजास्त बोलीप्रमाणे लिलाव होऊन प्लाॕॅटवाटप करावे, असे मत राष्ट्रवादीच्या सहा संचालकांनी नोंदवले होते. मात्र, या सहा संचालकांचे म्हणणे विचारात न घेता अनावश्यक लोकांना नाममात्र फीची पावती घेऊन प्लाॕॅट देण्यात आले आहेत. त्या ठरावासदेखील विरोध केला होता. तशी नोंदवहीत सभा रजिस्टरला नोंद आहे. तरीही, बोगस कागदपत्रे तयार करून प्रस्ताव सादर केल्याने ते मंजूर करू नयेत, असा अर्ज सहा संचालकांनी केला होता. अर्ज मंजूर केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. असे असताना ९ जुलै रोजी या बोगस प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. ही मंजुरी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून घेतल्याचा व मोठा गैरप्रकार केल्याचा आरोप संचालकांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

तीन कोटींचे भूखंड

या २२ भूखंडांची किंमत ३ कोटी रुपये आहे. हे भूखंड गरजू नागरिक, व्यापाऱ्यांना न देता सत्ताधारी संचालकांच्या नातेवाइकांच्या नावावर नाममात्र किमतीची पावती फाडून वाटप केले आहेत. नंतर, हे प्लाॕॅट १५-२० लाखांत विकण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे. या भूखंड वाटपाचा आदेश रद्द न झाल्यास आंदोलन करणार आहोत. - चिंतामण संजय सोळंके, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, धारूर

नियमानुसार कार्यवाही, कुठलाही गैरप्रकार नाही

बाजार समिती क्षेत्रातील २२ प्लाॕॅट हे रिकामे होते. सर्व नियमांचे पालन करून या प्लाॕॅटचे वाटप नियमानुसार करण्यात आले आहे. कुठलाही गैरप्रकार नाही. बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. - महादेव बडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, धारूर

===Photopath===

240421\24bed_1_24042021_14.jpg