शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जिल्ह्यात कोरोनाकाळात १९ टन जैविक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहारांवर चांगलेच दुष्परिणाम झालेत. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहारांवर चांगलेच दुष्परिणाम झालेत. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांचे दैनंदिन व्यवहार बंद झाल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. जो आपल्या व्यवसायात आठ ते दहा लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांची रोजीरोटी चालवत होता, तोच मालक आता दुसऱ्याच्या दुकानावर नोकर म्हणून काम करत आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले, त्याचा ताण रुग्णालयावर आला.

कोरोनाच्या काळात जवळपास सहापटीने जैविक जैविक कचरा वाढला होता. कोरोनाकाळाच्या पूर्वीचा पाच वर्षांचा तुलनात्मक अभ्यास केला तर सरासरी हा कचरा वर्षाला अडीच ते तीन टन निघत होता. कोरोनाच्या काळात आरोग्यविषयक संरक्षणात्मक सुविधा वाढल्या आणि कचरा हा १९ ते २० टनांपर्यंत गेला होता. हा सर्व कचरा एजन्सीने जमा केलेला आहे.

पाच वर्षांचा कचरा

नऊ महिन्यांत

कोरोनाच्या पाच वर्षांपूर्वीच्या काळात जैविक कचरा वर्षाकाठी सरासरी तीन टन निघत होता. कोरोनाच्या काळात हे प्रमाण जवळपास सहापटीने वाढले आहे. कोरोनामुळे प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत होता. त्यामुळे आरोग्य संरक्षक साधनाचा, जैविक वस्तूंचाही मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता.

जैविक कचरा नियमबाह्य पद्धतीने फेकणाऱ्या व्यक्ती आणि रुग्णालयांवर पालिकेने या कोरोनाच्या नऊ महिन्यांत एकही कारवाई जिल्ह्यातील नगरपालिकेने केली नाही. आज जिल्ह्यात खासगी आणि शासकीय रुग्णालयांच्या परिसरात सर्रास जैविक कचरा (मेडिकल वेस्ट) टाकला जातो.

प्रदूषण महामंडळ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच प्रत्येक रुग्णालयाने जैविक कचऱ्याची विल्हेवाट काळजीपूर्वक लावणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा रुग्णालयांविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागेल.

- आर. बी. पवार,

जिल्हा आरोग्य अधिकारी