शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सीबीएसईचे ११०० विद्यार्थी परीक्षा न देताच होणार पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे परीक्षा न देताच ...

बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे परीक्षा न देताच जिल्ह्यातील ११०० विद्यार्थी पास झाले आहेत. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असले तरी बहुतांश पालक नाराजी दर्शवित आहेत. मुलांच्या शिक्षणावर मोठा खर्च करून वर्षाच्या शेवटी परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे या पालकांचे म्हणणे आहे.

मागील वर्षी मार्चपासून देशात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला. ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू झाली; मात्र अनेक ठिकाणी ही प्रणाली दिखाऊच राहिली, तर काही ठिकाणी सुरळीत राबवता आली; परंतु जेमतेम परिस्थिती व तांत्रिक अडचणींमुळे अनेक मुलांचा परिपूर्ण अभ्यास होऊ शकला नाही. शाळेची फीस, इतर पूरक शैक्षणिक बाबींवरील खर्च पालकांनी पेलला. फेब्रुवारीमध्ये सीबीएसईने नव्या नियमानुसार यंदा दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नाही, असे सूचित केले होते; मात्र विद्यार्थ्यांची क्षमता, पालकांचे स्वप्न, बौद्धिक कुवत विकसित कशी होणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला होता. यातच एप्रिलमध्ये केंद्रीय बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

सीबीएसई बोर्डामार्फतच मूल्यांकनाचे मापदंड तयार करण्यात येणार आहेत. त्या आधारे सीबीएसई दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे. स्वत:चे कौशल्य सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांची ही पहिलीच परीक्षा असते. अंतर्गत मूल्यमापन, शाळेतच परीक्षा घ्याव्यात, असे पर्याय पुढे आले तरी सर्वच बोर्डात गुणदान पद्धत समपातळीवर कशी आणणार, असा प्रश्न आहे. कारण दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थ्यांची ग्रहण करण्याची क्षमता कशा तपासणार?

----------

पालक काय म्हणतात?

परीक्षा व्हायला पाहिजे. मूल्यांकन कसे करणार ? हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. अभ्यास करून मेहनत वाया जाते, अशी भावना बनत असल्याने मुले नैराश्यात जातात. त्यामुळे सुटी मिळूनही मुले आनंदी नाहीत. -- अंजली रेड्डी, अंबाजोगाई.

-----------

हा निर्णय योग्य नाही. ऑफलाइन परीक्षा व्हायला हव्यात. परीक्षेचे उद्दिष्ट नसेल तर भविष्यात त्यांचा आत्मविश्वास डळमळून जाईल. काळजी घेऊन सगळं काही सुरू आहे तर परीक्षेला काय हरकत होती. होम सेंटरला घेता आल्या असत्या. - कमलेश कासट, बीड.

---------

कोविडमुळे परीक्षा रद्द झाल्या ते योग्य असले तरी परीक्षा रद्द न करता उशिरा का होईना परीक्षा घ्यायला पाहिजे. शाळा फीस, स्कूल बस, गणवेश व इतर बाबींवर खर्च करूनही परीक्षा नसल्याने अभ्यासू मुलांचे नुकसान झाले आहे. - हनुमंत डाके, माजलगाव.

---------

पुढचे प्रवेश कसे होणार?

अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक शिक्षणासाठी सरसकट प्रवेश महाविद्यालयांना द्यावे लागतील. त्याचबरोबर प्रवेशासाठी स्वतंत्र ऑनलाइन परीक्षा हा पर्याय असू शकतो. यासंदर्भात शासनाकडून सूचना, मार्गदर्शन अपेक्षित आहे.

---------

सीबीएसई दहावीच्या शाळा १२

मुले ५६०

मुली ५४०

विद्यार्थी ११००

----------