शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे ११०० विद्यार्थी परीक्षा न देताच होणार पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे परीक्षा न देताच ...

बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे परीक्षा न देताच जिल्ह्यातील ११०० विद्यार्थी पास झाले आहेत. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असले तरी बहुतांश पालक नाराजी दर्शवित आहेत. मुलांच्या शिक्षणावर मोठा खर्च करून वर्षाच्या शेवटी परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे या पालकांचे म्हणणे आहे.

मागील वर्षी मार्चपासून देशात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला. ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू झाली; मात्र अनेक ठिकाणी ही प्रणाली दिखाऊच राहिली, तर काही ठिकाणी सुरळीत राबवता आली; परंतु जेमतेम परिस्थिती व तांत्रिक अडचणींमुळे अनेक मुलांचा परिपूर्ण अभ्यास होऊ शकला नाही. शाळेची फीस, इतर पूरक शैक्षणिक बाबींवरील खर्च पालकांनी पेलला. फेब्रुवारीमध्ये सीबीएसईने नव्या नियमानुसार यंदा दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नाही, असे सूचित केले होते; मात्र विद्यार्थ्यांची क्षमता, पालकांचे स्वप्न, बौद्धिक कुवत विकसित कशी होणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला होता. यातच एप्रिलमध्ये केंद्रीय बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

सीबीएसई बोर्डामार्फतच मूल्यांकनाचे मापदंड तयार करण्यात येणार आहेत. त्या आधारे सीबीएसई दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे. स्वत:चे कौशल्य सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांची ही पहिलीच परीक्षा असते. अंतर्गत मूल्यमापन, शाळेतच परीक्षा घ्याव्यात, असे पर्याय पुढे आले तरी सर्वच बोर्डात गुणदान पद्धत समपातळीवर कशी आणणार, असा प्रश्न आहे. कारण दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थ्यांची ग्रहण करण्याची क्षमता कशा तपासणार?

----------

पालक काय म्हणतात?

परीक्षा व्हायला पाहिजे. मूल्यांकन कसे करणार ? हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. अभ्यास करून मेहनत वाया जाते, अशी भावना बनत असल्याने मुले नैराश्यात जातात. त्यामुळे सुटी मिळूनही मुले आनंदी नाहीत. -- अंजली रेड्डी, अंबाजोगाई.

-----------

हा निर्णय योग्य नाही. ऑफलाइन परीक्षा व्हायला हव्यात. परीक्षेचे उद्दिष्ट नसेल तर भविष्यात त्यांचा आत्मविश्वास डळमळून जाईल. काळजी घेऊन सगळं काही सुरू आहे तर परीक्षेला काय हरकत होती. होम सेंटरला घेता आल्या असत्या. - कमलेश कासट, बीड.

---------

कोविडमुळे परीक्षा रद्द झाल्या ते योग्य असले तरी परीक्षा रद्द न करता उशिरा का होईना परीक्षा घ्यायला पाहिजे. शाळा फीस, स्कूल बस, गणवेश व इतर बाबींवर खर्च करूनही परीक्षा नसल्याने अभ्यासू मुलांचे नुकसान झाले आहे. - हनुमंत डाके, माजलगाव.

---------

पुढचे प्रवेश कसे होणार?

अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक शिक्षणासाठी सरसकट प्रवेश महाविद्यालयांना द्यावे लागतील. त्याचबरोबर प्रवेशासाठी स्वतंत्र ऑनलाइन परीक्षा हा पर्याय असू शकतो. यासंदर्भात शासनाकडून सूचना, मार्गदर्शन अपेक्षित आहे.

---------

सीबीएसई दहावीच्या शाळा १२

मुले ५६०

मुली ५४०

विद्यार्थी ११००

----------