शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

जिल्ह्यात १०० टक्के शाळा सुरू, विद्यार्थी मात्र ६० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही ...

बीड : जिल्ह्यातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले आहेत. एकूण २४२३ शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू झाले असून जवळपास ६० टक्के विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.

कोरोना आपत्तीमुळे चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास नऊ महिन्यांचा विलंब झाला. या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागात अनेक अडचणींमुळे थेट विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पाेहोचले नाही. तर दुसरीकडे शहरी भागातील मुलांनाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ही प्रणाली फारशी प्रभावी ठरू शकली नाही. दरम्यान, शासनाने कोविड-१९ बाबत मार्गदर्शक सूचनांनुसार दक्षता घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. या वर्गांमध्ये दिवसेंदिवस उपस्थिती वाढत राहिली. तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शाळांकडूनही कोविडबाबत सर्व पातळीवर दक्षता घेण्यात येत आहे. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आता नियमित सुरू असून प्रसंगी तासिकांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न काही शाळांमधून सुरू आहे.

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा १६५५

सुरू झालेल्या शाळा १६५५

नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा ७६८

सुरू झालेल्या शाळा ७६८

विद्यार्थी संख्या

पाचवी ते आठवी २,०९,०८६

उपस्थिती १,१५,७९७

नववी ते बारावी १,६७,५०२

उपस्थिती १,०५,०००

शाळा सुरू झाल्यापासून एकही शिक्षक अथवा विद्यार्थी बाधित झालेला नाही. तसा अहवाल आलेला नाही. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त पोहोचले आहे. पालकांनी कोरोनाला न घाबरता योग्य ती काळजी घेऊन आपल्या पाल्यांना पाठवण्यास हरकत नाही.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), जि प., बीड

----

शाळांमध्ये का वाढली उपस्थिती?

दहा महिने ऑनलाइन अभ्यासामुळे मुले घरी कंटाळली होती. त्यांच्या शंकांचे समाधान होत नव्हते. मोबाइलच्या अतिवापरामुळे ते एकलकोंडे बनत चालले होते. अलीकडच्या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांचे प्रमाणही कमी होत असल्याने पालकही समंजसपणे आणि दक्षता घेत विचार करू लागले आहेत. आता मुलांनाही मोकळे आणि स्वच्छंद वाटत असून शाळेत जाण्याचा उत्साह वाढला आहे. मोजक्या तासिकांमुळे का होईना शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा थेट संवाद होत आहे.

----

जिल्ह्यात एकही विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी बाधित नाही

२७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्याआधी चार दिवसांपासून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. याच ९५९५ शिक्षकांपैकी १२८ शिक्षक बाधित आढळले. उपचारानंतर ते सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. उर्वरित शिक्षक शाळांवर कार्यरत असून शाळा सुरू झाल्यापासून एकही शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळलेले नाहीत.

-------

४० टक्के विद्यार्थी का अनुपस्थित?

जिल्ह्यातील बहुतांश ऊसतोडणी कामगार व इतर श्रमिकांनी रोजगारासाठी सध्या स्थलांतर केलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने त्यांच्यासोबत अनेक पाल्य गेलेले आहेत. अद्याप ग्रामीण भागातून बसची सुविधा नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरात येण्यास अडचणी आहेत. दुसरीकडे शहरातील पालक अद्यापही कोरोनाबाबत साशंक असून त्यांनी संमतीपत्र न दिल्याने विद्यार्थी घरीच आहेत. त्याचा परिणाम शाळांतील उपस्थितीवर झाल्याचे दिसून येत आहे.

----------