शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

उन्हापासून संरक्षण करणारे प्लॅस्टिक कव्हर पावसात काय कामाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:07 IST

सध्या सनरूफ म्हणून असणारे प्लॅस्टिकचे एक कव्हर दुचाकीचालक वापरत आहेत. मात्र त्याचा वापर करणे खरोखरच योग्य आहे की अयोग्य ते पाहाण्याची गरज आहे.

या पावसाळ्यामध्ये मुंबईत व शहरांमध्ये अनेक स्कूटर्सना प्लॅस्टिकचे छत वा कव्हर लावण्याची फॅशनच आहील आहे. चिनी कंपन्या आपल्या भारतातील लोकांची गरज ओळखून काहीवेळा कोणत्याही वस्तू ग्राहकांच्या माथ्यावर मारतात, किंवा आपल्या येथील वितरक व व्यापारी आपली डोकॅलिटी वापरून अशा व्सतू खपवण्याचे काम करीत असतात. अगदी ऑनलाईन विक्रीही अशा साधनांची होत असताना दिसते. वस्तू घेताना मुळात त्याचा वैज्ञानिक अंगाने विचार करून ती घेण्याची गरज आहे. ध्या बाजारात आलेले हे रुफ कव्हर उन्हापासून संरक्षण देण्याच्या उद्दिष्टातून बनवलेले दिसते. ते पातळ प्लॅस्टिकपासून तयार केलेले असून लोखंडी पातळ सळ्यांच्या वापरातून त्याला आकार दिला गेला आहे व ते स्कूटरच्या पुढच्या बाजूने व मागच्या बाजूने प्लॅस्टिकच्या दोऱ्यांनी बांधले गेलेले आहे. चालकाला दिसण्यासाठी पुढील भाग प्लॅस्टिकचा फोल्डिंग पद्धतीने वापर करून तयार केला आहे. सर्वसाधारण बुद्धीमत्तेचा वापर करून तयार केलेले हे छत खरोखरच काही कामाचे आहे, असे भारतातील पावसावरून अजिबात म्हणता येणार नाही. मुळात ते कव्हर पावसासाठी नाही. पण उन्हासाठी म्हणून म्हणाल तर ते स्कूटरवर कशासाठी, कारण त्यामुळे स्कूटर वा दुचाकी यांच्या एरोडायनॅमिक रचनेला अडथळा आणणारे आहे, तसेच त्यामुळे दुचाकी चालवताना विशिष्ट वेगाच्या वर ती नेल्यास दुचाकीच्या बॅलन्सला, म्हणजे समतोलाला घातक आहे. त्यामुळे तोल जाऊ शकतो. शहरातील वाहतुकीची वर्दळ पाहाता, स्कूटर्स व मोटारसायकली ज्या पद्धतीने रस्त्यातून मार्गक्रमण करीत असतात, त्यात या प्रकारच्या कव्हरमुळे उन्हाचा त्रास सोडा, त्या स्कूटरला सायकलपेक्षाही कमी वेगात नेताना, बाजूच्या दुचाकीस्वाराला वा मोटारीलाही धक्का लागत असतो म्हणून सांभाळावे लागते.  जोरदार वाऱ्यामध्ये त्या कव्हरचे हेलकावणे म्हणजे एखाद्या जहाजाच्या शिडासारखे असते. वास्तविक विविध प्रकारच्या अॅक्सेसरीज बाजारात सादर करताना आरटीओसारख्या संस्थ्यांचा हस्तक्षेप असावा, असे आता वाटू लागले आहे. अशा प्रकारच्या वस्तूंमुळे अन्य लोकांना त्रास होऊ शकतो, त्या वस्तू वापरणाऱ्यांनाही त्याचा त्रास व अडचण होऊ शकते, हे लक्षात घेून त्या त्या वस्तू बाजारात विकण्यासाठी प्रतिबंध घालायचा की नाही, हे ठरवण्याची गरज आहे. अर्थात ज्यांना आपले पैसे अशा वैविध्यपूर्ण वस्तुंवर खर्चच करायचे असतात, त्यांच्याबाबत काहीच बोलता येत नाही. पण अशा प्रकारच्या साधनांमुळे कोणत्या तरी उत्पादकांचे खिसे भरले जात असतात, कालांतराने लोकांना त्याचा त्रास वाटू लागतो, ते त्रासदायक साधन असल्याचे पटू लागते व त्याचा वापर लोक बंद करतात. मात्र तोपर्यंतच्या काळामध्ये अशा अजब साधनांचा उत्पादक, व्यापारी, भरपूर कमाई करून बसलेला असतो.