शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

उन्हापासून संरक्षण करणारे प्लॅस्टिक कव्हर पावसात काय कामाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:07 IST

सध्या सनरूफ म्हणून असणारे प्लॅस्टिकचे एक कव्हर दुचाकीचालक वापरत आहेत. मात्र त्याचा वापर करणे खरोखरच योग्य आहे की अयोग्य ते पाहाण्याची गरज आहे.

या पावसाळ्यामध्ये मुंबईत व शहरांमध्ये अनेक स्कूटर्सना प्लॅस्टिकचे छत वा कव्हर लावण्याची फॅशनच आहील आहे. चिनी कंपन्या आपल्या भारतातील लोकांची गरज ओळखून काहीवेळा कोणत्याही वस्तू ग्राहकांच्या माथ्यावर मारतात, किंवा आपल्या येथील वितरक व व्यापारी आपली डोकॅलिटी वापरून अशा व्सतू खपवण्याचे काम करीत असतात. अगदी ऑनलाईन विक्रीही अशा साधनांची होत असताना दिसते. वस्तू घेताना मुळात त्याचा वैज्ञानिक अंगाने विचार करून ती घेण्याची गरज आहे. ध्या बाजारात आलेले हे रुफ कव्हर उन्हापासून संरक्षण देण्याच्या उद्दिष्टातून बनवलेले दिसते. ते पातळ प्लॅस्टिकपासून तयार केलेले असून लोखंडी पातळ सळ्यांच्या वापरातून त्याला आकार दिला गेला आहे व ते स्कूटरच्या पुढच्या बाजूने व मागच्या बाजूने प्लॅस्टिकच्या दोऱ्यांनी बांधले गेलेले आहे. चालकाला दिसण्यासाठी पुढील भाग प्लॅस्टिकचा फोल्डिंग पद्धतीने वापर करून तयार केला आहे. सर्वसाधारण बुद्धीमत्तेचा वापर करून तयार केलेले हे छत खरोखरच काही कामाचे आहे, असे भारतातील पावसावरून अजिबात म्हणता येणार नाही. मुळात ते कव्हर पावसासाठी नाही. पण उन्हासाठी म्हणून म्हणाल तर ते स्कूटरवर कशासाठी, कारण त्यामुळे स्कूटर वा दुचाकी यांच्या एरोडायनॅमिक रचनेला अडथळा आणणारे आहे, तसेच त्यामुळे दुचाकी चालवताना विशिष्ट वेगाच्या वर ती नेल्यास दुचाकीच्या बॅलन्सला, म्हणजे समतोलाला घातक आहे. त्यामुळे तोल जाऊ शकतो. शहरातील वाहतुकीची वर्दळ पाहाता, स्कूटर्स व मोटारसायकली ज्या पद्धतीने रस्त्यातून मार्गक्रमण करीत असतात, त्यात या प्रकारच्या कव्हरमुळे उन्हाचा त्रास सोडा, त्या स्कूटरला सायकलपेक्षाही कमी वेगात नेताना, बाजूच्या दुचाकीस्वाराला वा मोटारीलाही धक्का लागत असतो म्हणून सांभाळावे लागते.  जोरदार वाऱ्यामध्ये त्या कव्हरचे हेलकावणे म्हणजे एखाद्या जहाजाच्या शिडासारखे असते. वास्तविक विविध प्रकारच्या अॅक्सेसरीज बाजारात सादर करताना आरटीओसारख्या संस्थ्यांचा हस्तक्षेप असावा, असे आता वाटू लागले आहे. अशा प्रकारच्या वस्तूंमुळे अन्य लोकांना त्रास होऊ शकतो, त्या वस्तू वापरणाऱ्यांनाही त्याचा त्रास व अडचण होऊ शकते, हे लक्षात घेून त्या त्या वस्तू बाजारात विकण्यासाठी प्रतिबंध घालायचा की नाही, हे ठरवण्याची गरज आहे. अर्थात ज्यांना आपले पैसे अशा वैविध्यपूर्ण वस्तुंवर खर्चच करायचे असतात, त्यांच्याबाबत काहीच बोलता येत नाही. पण अशा प्रकारच्या साधनांमुळे कोणत्या तरी उत्पादकांचे खिसे भरले जात असतात, कालांतराने लोकांना त्याचा त्रास वाटू लागतो, ते त्रासदायक साधन असल्याचे पटू लागते व त्याचा वापर लोक बंद करतात. मात्र तोपर्यंतच्या काळामध्ये अशा अजब साधनांचा उत्पादक, व्यापारी, भरपूर कमाई करून बसलेला असतो.