शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हापासून संरक्षण करणारे प्लॅस्टिक कव्हर पावसात काय कामाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:07 IST

सध्या सनरूफ म्हणून असणारे प्लॅस्टिकचे एक कव्हर दुचाकीचालक वापरत आहेत. मात्र त्याचा वापर करणे खरोखरच योग्य आहे की अयोग्य ते पाहाण्याची गरज आहे.

या पावसाळ्यामध्ये मुंबईत व शहरांमध्ये अनेक स्कूटर्सना प्लॅस्टिकचे छत वा कव्हर लावण्याची फॅशनच आहील आहे. चिनी कंपन्या आपल्या भारतातील लोकांची गरज ओळखून काहीवेळा कोणत्याही वस्तू ग्राहकांच्या माथ्यावर मारतात, किंवा आपल्या येथील वितरक व व्यापारी आपली डोकॅलिटी वापरून अशा व्सतू खपवण्याचे काम करीत असतात. अगदी ऑनलाईन विक्रीही अशा साधनांची होत असताना दिसते. वस्तू घेताना मुळात त्याचा वैज्ञानिक अंगाने विचार करून ती घेण्याची गरज आहे. ध्या बाजारात आलेले हे रुफ कव्हर उन्हापासून संरक्षण देण्याच्या उद्दिष्टातून बनवलेले दिसते. ते पातळ प्लॅस्टिकपासून तयार केलेले असून लोखंडी पातळ सळ्यांच्या वापरातून त्याला आकार दिला गेला आहे व ते स्कूटरच्या पुढच्या बाजूने व मागच्या बाजूने प्लॅस्टिकच्या दोऱ्यांनी बांधले गेलेले आहे. चालकाला दिसण्यासाठी पुढील भाग प्लॅस्टिकचा फोल्डिंग पद्धतीने वापर करून तयार केला आहे. सर्वसाधारण बुद्धीमत्तेचा वापर करून तयार केलेले हे छत खरोखरच काही कामाचे आहे, असे भारतातील पावसावरून अजिबात म्हणता येणार नाही. मुळात ते कव्हर पावसासाठी नाही. पण उन्हासाठी म्हणून म्हणाल तर ते स्कूटरवर कशासाठी, कारण त्यामुळे स्कूटर वा दुचाकी यांच्या एरोडायनॅमिक रचनेला अडथळा आणणारे आहे, तसेच त्यामुळे दुचाकी चालवताना विशिष्ट वेगाच्या वर ती नेल्यास दुचाकीच्या बॅलन्सला, म्हणजे समतोलाला घातक आहे. त्यामुळे तोल जाऊ शकतो. शहरातील वाहतुकीची वर्दळ पाहाता, स्कूटर्स व मोटारसायकली ज्या पद्धतीने रस्त्यातून मार्गक्रमण करीत असतात, त्यात या प्रकारच्या कव्हरमुळे उन्हाचा त्रास सोडा, त्या स्कूटरला सायकलपेक्षाही कमी वेगात नेताना, बाजूच्या दुचाकीस्वाराला वा मोटारीलाही धक्का लागत असतो म्हणून सांभाळावे लागते.  जोरदार वाऱ्यामध्ये त्या कव्हरचे हेलकावणे म्हणजे एखाद्या जहाजाच्या शिडासारखे असते. वास्तविक विविध प्रकारच्या अॅक्सेसरीज बाजारात सादर करताना आरटीओसारख्या संस्थ्यांचा हस्तक्षेप असावा, असे आता वाटू लागले आहे. अशा प्रकारच्या वस्तूंमुळे अन्य लोकांना त्रास होऊ शकतो, त्या वस्तू वापरणाऱ्यांनाही त्याचा त्रास व अडचण होऊ शकते, हे लक्षात घेून त्या त्या वस्तू बाजारात विकण्यासाठी प्रतिबंध घालायचा की नाही, हे ठरवण्याची गरज आहे. अर्थात ज्यांना आपले पैसे अशा वैविध्यपूर्ण वस्तुंवर खर्चच करायचे असतात, त्यांच्याबाबत काहीच बोलता येत नाही. पण अशा प्रकारच्या साधनांमुळे कोणत्या तरी उत्पादकांचे खिसे भरले जात असतात, कालांतराने लोकांना त्याचा त्रास वाटू लागतो, ते त्रासदायक साधन असल्याचे पटू लागते व त्याचा वापर लोक बंद करतात. मात्र तोपर्यंतच्या काळामध्ये अशा अजब साधनांचा उत्पादक, व्यापारी, भरपूर कमाई करून बसलेला असतो.