शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

जि.प.,पं.स.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: August 19, 2016 23:59 IST

मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे.

आयोगाचे निर्देश : ५ आॅक्टोबरला सोडतअमरावती : मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. यामध्ये ९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत प्रभागरचना होणार आहे. ५ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद गटांची व याच दिवशी तहसीलदारांमार्फत पंस गणांची आरक्षण सोडत काढणार आहेत.जिल्ह्यातील दहा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कार्यकाळ मार्च २०१७ अखेरीस संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर आयोगाने प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख १३ हजार ७०९ इतकी आहे. यामध्ये ३ लाख ४० हजार ५३४ अनुसूचित जाती व ३ लाख ६२ हजार ८९० इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या आधारावर जिल्हा परिषदेचे ५९ गट राहतील. यामध्ये ३० गट महिलांसाठी राखीव असतील. कहीं खुशी कहीं गमअमरावती : सर्वसाधारण प्रवर्गाकरिता २० व याच प्रवर्गात १० गट महिलासाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २० गट राखीव असून यातील ६ गट हे महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातींकरिता १२ गट राखीव आहेत. यामध्ये ६ गट महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागासप्रर्वगासाठी १६ गट राखीव असून यातील ८ गट महिलांसाठी आहेत. पंससाठी यावेळी ११८ गण राहणार आहेत. या निवडणुकीसाठी चिखलदरा, अमरावती व दर्यापूर तालुक्यातील प्रत्येकी एक गट वाढला आहे. तर अंजनगाव सुर्जी, भातकुली व चांदूररेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एक गट या निवडणुकीसाठी कमी करण्यात आला आहे.यामध्ये अंजनगाव सुर्जी, भातकुली तालुक्यांतील २०१२ मध्ये असलेल्या ४ गटांऐवजी आता तीनच गट राहणार आहेत. तर चांदूररेल्वे तालुक्यात तीनऐवजी दोनच गट राहतील. या तीन तालुक्यांत झेडपीचा एक गट कमी झाला आहे. तर दर्यापूर तालुक्यांत ४ऐवजी पाच गट होणार आहेत. चिखलदरा तालुक्यात एक गट वाढला असून तीनऐवजी चार गट झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यातून चार सदस्य आगामी निवडणुकीत निवडून द्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी प्रारूप प्रभागरचना प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करतील. त्या प्रस्तावाला २३ सप्टेंबरला मान्यता देण्यात येईल. २८ ला जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणार आहेत. ५ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी जि.प.गटांची व तहसीलदार पंस.गणांची आरक्षण सोडत काढतील. यावर १० ते २० आॅक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. या हरकतींवर १७ नोव्हेंबरला सुनावणी होवून २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल.