शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

झेडपीत भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ जुळेना?

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ लागत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये धडकी : नियमित पावती देण्याची मागणीअमरावती : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ लागत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावत्या देण्याची मागणी कर्मचाऱ्यामधून होत आहे.जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याकाठी भविष्य निर्वाह निधीची कपात केली जाते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना याबाबत पावती सुध्दा दिली जात होती. मात्र सन २०११-१२ मधील भवष्यनिवाह निधीच्या पावत्या आता देण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये कपातीचा ताळ मेळ जुळत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. सन २०११-१२ मधील पावतीनंतर भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मागील तीन ते चार वर्षापासून कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना त्याच्या कपात होणाऱ्या रक्कमेचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनासोबत भविष्य निर्वाह निधीबाबतची पावती देण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांना १ मार्च २०१२ पासून याबाबतच्या पावत्याच देण्यात आलेल्या नाहीत. पावत्या मिळत नसल्या तरीही अनेक कर्मचाऱ्यांना आपला व्यवहार सुरळीत असल्याचा समज झाला. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या खात्यातून भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेत तफावत दिसून आली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कपात बाबतची पावती दर महिन्या काठी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियने केली आहे.भविष्य निर्वाह निधीत कपात करण्यात आलेल्या रक्कमेच्या बाबत संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावती देण्यात यावी व यात असलेल्या उणीवा त्वरीत दुर कराव्यात अशी आमची मागणी आहे. - पंकज गुल्हाने, अध्यक्ष, जि. प. कर्मचारी युनियनकर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी कपातीच्या पावत्या त्यांना नियमित देण्याबातची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावती दिली जाईल- चंद्रशेखर खंडारे, मुख्यलेखा व वित्त अधिकारीजिल्हा परिषद