शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जिल्हा परिषदेत नाहरकत प्रमाणपत्राचा ठराव पारित

By admin | Updated: August 2, 2014 23:52 IST

जिल्हा परिषदेच्या मालकीची रक्ते विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत शनिवार याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी)

अमरावती : जिल्हा परिषदेच्या मालकीची रक्ते विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत शनिवार याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. मात्र या विषयावर कुठली कामे प्रस्तावित करावी यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आपले लेखी मत यावर नोंदविणार असल्याचेही सभागृहात ठरविण्यात आले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे जिल्ह्यातील रस्ते विकास कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी व यासाठी लागणारे जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठीची मागणी करणारे पत्र जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख व इतर २७ सदस्यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषद अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार आज शनिवारी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा मुद्दा नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सभागृहातील विषय सुचीवर होता. या मुद्यावर सभागृहात चर्चा सुरू होताच जिल्हा परिषदेचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामासाठी देण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी बबलू देशमुख यांनी सभागृहात केली. दरम्यान याचवेळी सुधीर सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे ३५९ रस्ते मागील वर्षी विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. मात्र यापैकी ७५ टक्के कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही कामे का पूर्ण करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करीत याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी सभागृहात केली. दरम्यान या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी दिले. ज्याप्रमाणे सदस्यांनी आपली मते मांडलीत त्याचप्रमाणे प्रशासनानेही आपली भूमिका मांडावी अशी मागणी अभिजीत ढेपे, रवींद्र मुंदे यांनी सभागृहात करताच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला विकासासाठी देता येतात असा अभिप्राय सभागृहात दिला. सुरेखा ठाकरे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेची रस्ते देत असताना मागील वर्षीच्या ३५९ रस्त्याच्या कामामध्ये बरीच रस्ते ही मातीकामाची आहेत त्यामुळे ही कामे करताना यंदा अशा कामावर खडीकरण व डांबरीकरण करावे, जिल्हा परिषदेला सध्या अतिवृष्टी व महापुरामुळे रस्ते खराब झाले त्यामुळे जिल्हा परिषदेला निधी द्यावा, कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करताना संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घ्यावे, अशा सूचना यावेळी सभागृहात अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा परिषद सभागृहात नाहरकत प्रमाणपत्र देताना आमदारांनी सुचविलेल्या सुमारे १७१ रस्ते कामासाठी मागितली. यावर २५ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. मात्र हे करीत असताना जिल्हा परिषद सदस्यांच्या सर्कल मधील कुठली रस्ते दुरूस्त करणे आवश्यक आहेत याबाबत सदस्यांनी सुचविलेले रस्ते समाविष्ट करावी अशी मागणी अभिजीत ढेपे, रवींद्र मुंदे, निशांत जाधव यांनी केली. या मुद्यावर बराच वेळ वादळी चर्चा झाली अखेर प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी आपले मत नोंदवावे असाही निर्णय घेण्यात आला. याशिवाय जिल्हा परिषदेची जी कामे नाहरकत प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी प्रस्तावित केली त्यामधून अंजनगाव व दर्यापूर तालुक्याला डावलले आहे त्यामुळे या तालुक्याचा समावेश केल्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये असे सुधीर सूर्यवंशी, रवींद्र मुंदे, ममता भांबूरकर, सतीश हाडोळे यांनी नोंदविले. सभेला अध्यक्ष सुरेखा ठाकरे, उपाध्यक्ष जयप्रकाश पटेल, सभापती महेंद्रसिंग गैलवार, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, अर्चना मुरूमकर, सदस्य बबलू देशमुख, सर्व सदस्य, अधिकारी उपस्थित होते.