शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

जिल्हा परिषदेतील कार्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांची कार्यालये ...

अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांची कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी ७ मे रोजी जारी केले. आरोग्य सेवा व ग्रामपंचायत विभाग यातून वगळण्यात आले आहेत.

जिल्ह्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिनस्थ कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. १५ मेपर्यंत कार्यालये बंद ठेवावीत. कामकाज सुरू ठेवायचे असल्यास ऑनलाइन पद्धतीने काम करावे, अशा सूचना सीईओ अविश्यांत पंडा यांनी आदेशात दिल्या आहेत. आरोग्य सेवा व ग्रामपंचायत आणि अत्याश्यक कार्यालये मात्र सुरू राहणार आहेत. दोन्ही यंत्रणा कोरोनाकाळात अतिशय महत्त्वाच्या असल्याने यामधून या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

बॉक्स

अभ्यासगतांनाही नो एन्ट्री

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांनाही मुख्यालयास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. विभागाप्रमुखांकडे कामासंदर्भात द्यायची निवेदने, तक्रारी या जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या ई-मेलवर किंवा व्हॉट्सॲपवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

बॉक्स

- तर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून त्यांच्या कार्यालयप्रमुखांच्या संपर्कात राहावे व भ्रमणध्वनी सुरू ठेवावे. आवश्यकता भासल्यास कार्यालयास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तथापि, कोणत्याही कारणास्तव संपर्कास प्रतिसाद न दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.