शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

४ कोटींची कामे वाचविण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची धडपड

By admin | Updated: November 20, 2014 22:44 IST

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली २५/१५ या लेखा शीर्षाअंतर्गत (लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे) जिल्हा परिषदेची सुमारे

अमरावती : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली २५/१५ या लेखा शीर्षाअंतर्गत (लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे) जिल्हा परिषदेची सुमारे ४ कोटी ७२ लक्ष रूपयांची कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वप्रथम 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. दरम्यान लेखाशिर्षाअंतर्गत मंजूर विकास कामे कायम राहावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी धडपड चालविली. याबाबत २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जि.प. स्थायी समितीच्या सभेत ही कामे रद्द करू नये याबाबत ठराव मांडणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापती गिरीश कराळे यांनी सांगितले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या २९ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यादरम्यान जि.प.चे शिष्टमंडळ भेटून त्यांना याबाबत साकडे घालण्यात येणार आहेतआघाडी शासनाने निवडणुकीपूर्वी घाईने मंजूर केलेली जिल्ह्यातील ४ कोटी ७२ लाखांची विकास कामे तातडीने थांबविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना केली आहे. ही सर्व कामे जि. प.च्या पंचायत विभागाशी संबंधित असून आतापर्यंत यातील वर्कआॅर्डर न मिळालेली एकूण ७२ कामांपैकी ५६ कामे रद्द केली आहे. यामुळे ३ कोटींची कामे परत पाठविण्यात आली आहेत. वर्कआॅर्डर मिळालेल्या कामांचा अहवाल १५ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना खुष करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व माजी पालकमंत्र्यांनी जाता जाता जिल्हा परिषदेची २५/१५ या लेखा शिर्षाअंतर्गत सुमारे ४ कोटी ७२ लक्ष रूपयांची विकास कामे मंजूर केली होती. निवडणुकीनंतर पुन्हा आघाडी सरकार येईल आणि हिवाळी अधिवेशनात या कामांना निधी मंजूर करून घेऊन तो डिसेंबरमध्ये उपलब्ध होईल, असा कयास होता. प्रत्यक्षात आघाडी सरकारची सत्ता गेली आणि भारतीय जनता पक्ष सत्तेवर आले. माजी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी घाईघाईने मंजूर केलेली कामे आता अडचणीत आली आहेत. आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कामे करण्यासाठी तब्बल ५ कोटी रूपये लागणार असल्याने ही कामे निधीअभावी थांबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. जिल्ह्यात ४.७२ कोटीची कामे अंतिम टप्प्यात मंजूर केली होती. वर्कआॅर्डर नसलेली ५६ कामे परत पाठविण्यात आली आहेत. तसेच चांदूररेल्वे २, धामनगाव रेल्वे ७, नांदगाव खंडेश्र्वर ७ अशा १६ कामांची वर्कआॅर्डर मिळालेली होती. त्या कामांच्या स्थिती काय आहे, याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने याचा अहवाल शासनाकडे रवाना केला आहे. या अहवालानुसार ती कामे झालेली नाहीत अशा कामेही थांबविली जाणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने घाईगडबडीने मंजूर कामांना खो बसला आहे. याबाबत लोकमतने विस्तुत वृत प्रकाशीत करताच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी खळबळून जागे झाले. ग्रामीण भागातील या मंजूर विकास कामावर गंडांतर येताच जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकासाची ही कामे राज्य शासनाने रद्द करू नये यासाठी सर्व ताकदीने प्रयत्न करणार आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे बांधकाम व शिक्षण समितीचे सभापती गिरीश कराळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)