शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

२ हजार ९०० नवपरिणितांच्या विवाह अनुदानासाठी येरझारा

By admin | Updated: January 6, 2016 00:14 IST

नवदाम्पत्यांच्या संसाराला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूसह शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली सामूहिक विवाह योजना लालफीतशाहीत अडकली आहे.

विवाहाच्या संख्येतही घट : अनियमिततेचा समूहातील विवाहितांचा आरोपअमरावती : नवदाम्पत्यांच्या संसाराला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूसह शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली सामूहिक विवाह योजना लालफीतशाहीत अडकली आहे. इतर अन्य योजनांप्रमाणे यातही दलालराज शिरल्याने एक चांगली योजना अंतिम घटका मोजत आहे. गेल्या ४ वर्षांपासून जिल्ह्यातील २,९०० पेक्षा अधिक नवपरिणीत जोडप्यांना सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात भेट दिल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पॅकेज घोषित झाले व शेतकरी आत्महत्यांचा बिकट प्रश्न चऱ्हाट्यावर आला. शेतकऱ्यांची दैनावस्था संसदेत गाजली. त्यावर एक छोटीसी उपाययोजना म्हणून शेतकरीकन्यांचे विवाह सामूहिक विवाह सोहळ्यांना बळ देण्यात आले. सानुग्रह अनुदान म्हणून नवपरिणीत दाम्पत्याला १० हजारांचे अनुदान देण्यात आले. २००६ मध्येही योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष धूमधडाक्यात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले. जोडपे आणि संबंधित सदस्यांना अनुदानही दिले. मात्र पुढे या योजनेला दलालराजाचे ग्रहण लागले.आरोप-प्रत्यारोपाने गाजू लागले विवाह सोहळे अतिशय कमी खर्चात आपल्या उपवर-मुला-मुलींचे लग्न करून देण्यासाठी शेतकरी वर्गासह अन्य सामान्यजणही एकवटले. पुढे यात विवाह झालेल्यांनाही अनुदानाच्या लाभासाठी बोहल्यावर चढविण्यात आले. अधिकाधिक जोडप्यांचा विवाह आपल्या संस्थेमार्फत व्हावा, यासाठी अहमहिका लागली. संबंधिंत संस्थेलाही जोडप्यांमागे निश्चित अशी अनुदानाची रक्कम मिळू लागल्याने हा ‘धंदा’ फोफावला. अपवाद वगळता अनुदान लाटण्यासाठी लग्न झालेल्यांनाही सामूहिक विवाह सोहळ्यातून उभे करण्यात आले. नेमकी हीच अनियमितता आणि भ्रष्टाचार शासनाच्या लक्षात आला आणि २०१० पासून राज्य शासनाने नवपरिणीत जोडपे आणि संबंधित संस्थांना देण्यात येत असलेल्या अनुदानाला कात्री लावली. यात खऱ्याखुऱ्या नवपरिणीत जोडप्यांनाही सानुग्रह मदतीपासून वंचित राहावे लागले. अनुदानाला कात्री लागल्याने गेल्या ३ वर्षांत सामूहिक विवाह सोहळ्यांची संख्या तुलनेत कमी झाली. २०१४-१५ मध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. प्रलंबित अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचा दावा महिला व बालकल्याण विभागाने केला आहे. तथापि, गेल्या पाच वर्षांपासून २९०० पेक्षा अधिक नवपरिणितांना अनुदानापासून वंचित रहावे लागल्याचे वास्तव आहे.