शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ९०० नवपरिणितांच्या विवाह अनुदानासाठी येरझारा

By admin | Updated: January 6, 2016 00:14 IST

नवदाम्पत्यांच्या संसाराला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूसह शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली सामूहिक विवाह योजना लालफीतशाहीत अडकली आहे.

विवाहाच्या संख्येतही घट : अनियमिततेचा समूहातील विवाहितांचा आरोपअमरावती : नवदाम्पत्यांच्या संसाराला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूसह शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली सामूहिक विवाह योजना लालफीतशाहीत अडकली आहे. इतर अन्य योजनांप्रमाणे यातही दलालराज शिरल्याने एक चांगली योजना अंतिम घटका मोजत आहे. गेल्या ४ वर्षांपासून जिल्ह्यातील २,९०० पेक्षा अधिक नवपरिणीत जोडप्यांना सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात भेट दिल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पॅकेज घोषित झाले व शेतकरी आत्महत्यांचा बिकट प्रश्न चऱ्हाट्यावर आला. शेतकऱ्यांची दैनावस्था संसदेत गाजली. त्यावर एक छोटीसी उपाययोजना म्हणून शेतकरीकन्यांचे विवाह सामूहिक विवाह सोहळ्यांना बळ देण्यात आले. सानुग्रह अनुदान म्हणून नवपरिणीत दाम्पत्याला १० हजारांचे अनुदान देण्यात आले. २००६ मध्येही योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष धूमधडाक्यात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले. जोडपे आणि संबंधित सदस्यांना अनुदानही दिले. मात्र पुढे या योजनेला दलालराजाचे ग्रहण लागले.आरोप-प्रत्यारोपाने गाजू लागले विवाह सोहळे अतिशय कमी खर्चात आपल्या उपवर-मुला-मुलींचे लग्न करून देण्यासाठी शेतकरी वर्गासह अन्य सामान्यजणही एकवटले. पुढे यात विवाह झालेल्यांनाही अनुदानाच्या लाभासाठी बोहल्यावर चढविण्यात आले. अधिकाधिक जोडप्यांचा विवाह आपल्या संस्थेमार्फत व्हावा, यासाठी अहमहिका लागली. संबंधिंत संस्थेलाही जोडप्यांमागे निश्चित अशी अनुदानाची रक्कम मिळू लागल्याने हा ‘धंदा’ फोफावला. अपवाद वगळता अनुदान लाटण्यासाठी लग्न झालेल्यांनाही सामूहिक विवाह सोहळ्यातून उभे करण्यात आले. नेमकी हीच अनियमितता आणि भ्रष्टाचार शासनाच्या लक्षात आला आणि २०१० पासून राज्य शासनाने नवपरिणीत जोडपे आणि संबंधित संस्थांना देण्यात येत असलेल्या अनुदानाला कात्री लावली. यात खऱ्याखुऱ्या नवपरिणीत जोडप्यांनाही सानुग्रह मदतीपासून वंचित राहावे लागले. अनुदानाला कात्री लागल्याने गेल्या ३ वर्षांत सामूहिक विवाह सोहळ्यांची संख्या तुलनेत कमी झाली. २०१४-१५ मध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. प्रलंबित अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचा दावा महिला व बालकल्याण विभागाने केला आहे. तथापि, गेल्या पाच वर्षांपासून २९०० पेक्षा अधिक नवपरिणितांना अनुदानापासून वंचित रहावे लागल्याचे वास्तव आहे.