शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

सल्फरच्या अत्याधिक मिश्रणाने गुळाचा पिवळा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

फोटो - चांदूर बाजार १६ एस सुमीत हरकुट - चांदूर बाजार - घाटाच्या गुळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात ...

फोटो - चांदूर बाजार १६ एस

सुमीत हरकुट - चांदूर बाजार - घाटाच्या गुळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पिवळा भेसळयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जात आहे. रवेदार तसेच आरोग्यास गुणकारी असलेल्या घाटाच्या गुळाची आजही मागणी आहे. मात्र, ती तालुक्याबाहेरच जास्त असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. घाटाचा गूळ व सेंद्रिय गुळाच्या नावावर नागरिक रसायनयुक्त पिवळ्या गुळाला तालुक्यातील नागरिकांकडून वापर केला जात आहे.

गुळाला पिवळा रंग येण्यासाठी सल्फरची पावडर मिसळण्याची पद्धत आहे. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा गुळात जास्तच भेसळ होत आहे. त्यासोबत अन्य काही रसायनेसुद्धा मिसळली जात आहेत. याकडे अन्न सुरक्षा विभागाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. या पिवळ्या व स्वछ दिसणाऱ्या गुळात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्यूलेशन २०११ च्या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डायऑक्साईड वापर करण्याची परवानगी आहे. परंतु, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गूळ तयार करणारे आपल्या अंदाजाने सल्फर मिसळत असतात. मुळात हे प्रमाण ३५० ते १००० पीपीएम सुद्धा असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्याही पदार्थांना अधिक पिवळेपणा येण्यासाठी ‘मेटॅनिल येलो’ ही रासायनिक पूड वापरली जाते.

हळदीतही ‘मेटॅनिल येलो’चा वापर

हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलो पूड वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे गूळ पिवळाधमक करण्यासाठी काही ठिकाणी मेटॅनिल येलो या रसायनाचा वापर केला जातो. त्यानंतर वापरला जाणारा घटक म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हा आहे. सर्वसाधारणपणे गूळ तयार करण्यासाठी सर्रास सोडियम कार्बोनेटचा वापर होत असतो. याशिवाय झेडएफएस आणि सोडियम हाड्रोफॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट अशा रसायनाचा उपयोग गुळाला अधिकाधिक चमकदार करण्यासाठी केला जातो.

जीवघेणे आजार होण्याची शक्यता

रसायनाचा अधिक वापर केल्याने अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे रसायनाचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार करणे हे आरोग्यासाठी हितावह ठरते. मात्र, नफा मिळवण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. यामुळे गूळ खरेदी करताना नैसर्गिकपणा तपासणे गरजेचे झाले आहे.

अशी होते गूळनिर्मिती

सर्वसाधारणपणे गुळाची निर्मिती करताना गुळाचा रस उकळला जातो. त्यावेळी त्यातील कचरा काढण्यासाठी चुना टाकला जातो. त्यानंतर त्यात भेंडीच्या पानांची पावडर टाकली जाते. त्यामुळे गुळाला चव येते.