शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सल्फरच्या अत्याधिक मिश्रणाने गुळाचा पिवळा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

फोटो - चांदूर बाजार १६ एस सुमीत हरकुट - चांदूर बाजार - घाटाच्या गुळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात ...

फोटो - चांदूर बाजार १६ एस

सुमीत हरकुट - चांदूर बाजार - घाटाच्या गुळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पिवळा भेसळयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जात आहे. रवेदार तसेच आरोग्यास गुणकारी असलेल्या घाटाच्या गुळाची आजही मागणी आहे. मात्र, ती तालुक्याबाहेरच जास्त असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. घाटाचा गूळ व सेंद्रिय गुळाच्या नावावर नागरिक रसायनयुक्त पिवळ्या गुळाला तालुक्यातील नागरिकांकडून वापर केला जात आहे.

गुळाला पिवळा रंग येण्यासाठी सल्फरची पावडर मिसळण्याची पद्धत आहे. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा गुळात जास्तच भेसळ होत आहे. त्यासोबत अन्य काही रसायनेसुद्धा मिसळली जात आहेत. याकडे अन्न सुरक्षा विभागाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. या पिवळ्या व स्वछ दिसणाऱ्या गुळात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्यूलेशन २०११ च्या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डायऑक्साईड वापर करण्याची परवानगी आहे. परंतु, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गूळ तयार करणारे आपल्या अंदाजाने सल्फर मिसळत असतात. मुळात हे प्रमाण ३५० ते १००० पीपीएम सुद्धा असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्याही पदार्थांना अधिक पिवळेपणा येण्यासाठी ‘मेटॅनिल येलो’ ही रासायनिक पूड वापरली जाते.

हळदीतही ‘मेटॅनिल येलो’चा वापर

हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलो पूड वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे गूळ पिवळाधमक करण्यासाठी काही ठिकाणी मेटॅनिल येलो या रसायनाचा वापर केला जातो. त्यानंतर वापरला जाणारा घटक म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हा आहे. सर्वसाधारणपणे गूळ तयार करण्यासाठी सर्रास सोडियम कार्बोनेटचा वापर होत असतो. याशिवाय झेडएफएस आणि सोडियम हाड्रोफॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट अशा रसायनाचा उपयोग गुळाला अधिकाधिक चमकदार करण्यासाठी केला जातो.

जीवघेणे आजार होण्याची शक्यता

रसायनाचा अधिक वापर केल्याने अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे रसायनाचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार करणे हे आरोग्यासाठी हितावह ठरते. मात्र, नफा मिळवण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. यामुळे गूळ खरेदी करताना नैसर्गिकपणा तपासणे गरजेचे झाले आहे.

अशी होते गूळनिर्मिती

सर्वसाधारणपणे गुळाची निर्मिती करताना गुळाचा रस उकळला जातो. त्यावेळी त्यातील कचरा काढण्यासाठी चुना टाकला जातो. त्यानंतर त्यात भेंडीच्या पानांची पावडर टाकली जाते. त्यामुळे गुळाला चव येते.