शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

यंदा कपाशीची फक्त १६० किलो उत्पादकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:00 IST

यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले.

ठळक मुद्देनजरअंदाज अहवाल : शेतकरी अडचणीत, भरपाईची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता अहवाल काय दर्शवितो, याची शेतकऱ्यांना उत्सुकता होती. कापसाचे (रूई)े हेक्टरी १६० किलो उत्पादन होणार असल्याचा अहवाल शासनाला सादर झाल्याची माहिती आहे.यंदाच्या हंगामात बीटी कपाशीवर आॅक्टोबर महिन्यापासूनच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्यात ९६ टक्क््यांपर्यंत बोंडे किडली असल्याचे अहवालाद नमूद केलेले आहे. या समितीमध्ये कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचादेखील सहभाग आहे. हे ‘जीएचआय’ प्रमाणपत्र कृषी संचालकांनादेखील सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागद्वारा जाहीर करण्यात येणारी प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता काय राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता हेक्टरी १६० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचा अहवाल कृषी सहसंचालकांना सादर झाला व हीच उत्पादकता शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.यंदा पेरणीपासून कमी पावसाने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची संकट ओढवले. यामधून जी कपाशी बचावली, त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात ‘रोटाव्हेटर’ फिरविले. जिल्ह्यात यंदा २ लाख ७ हजार ४५७ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. मात्र, बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिरोध करण्याचा जीन्स असताना बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाची बियाणे विक्री केल्यामुळेच संकट ओढावले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रयोगशाळेच्या परीक्षणाअंतीदेखील पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये गुलाबी बोंड अळीला मारक क्षमता नसल्याने सिद्ध झाल्याने शासनानेदेखील या कंपन्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याने शेतकऱ्यांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.पीकविम्याचा मिळावा लाभयंदाचा खरीप हंगाम सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पावसाने उद्ध्वस्त झाला. पावसात सलग खंड राहिला आहे. त्यामुळे एनडीआरएफ व पीक विम्याच्या निकषानुसार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळायला पाहिजे. आता तर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने ३३ टक्क््यांवर नुकसान झाले आहे. ही दोन्ही आपत्ती भरपाई मिळण्यास पात्र असल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.