शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

यंदा कपाशीची फक्त १६० किलो उत्पादकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:00 IST

यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले.

ठळक मुद्देनजरअंदाज अहवाल : शेतकरी अडचणीत, भरपाईची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता अहवाल काय दर्शवितो, याची शेतकऱ्यांना उत्सुकता होती. कापसाचे (रूई)े हेक्टरी १६० किलो उत्पादन होणार असल्याचा अहवाल शासनाला सादर झाल्याची माहिती आहे.यंदाच्या हंगामात बीटी कपाशीवर आॅक्टोबर महिन्यापासूनच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्यात ९६ टक्क््यांपर्यंत बोंडे किडली असल्याचे अहवालाद नमूद केलेले आहे. या समितीमध्ये कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचादेखील सहभाग आहे. हे ‘जीएचआय’ प्रमाणपत्र कृषी संचालकांनादेखील सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागद्वारा जाहीर करण्यात येणारी प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता काय राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता हेक्टरी १६० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचा अहवाल कृषी सहसंचालकांना सादर झाला व हीच उत्पादकता शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.यंदा पेरणीपासून कमी पावसाने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची संकट ओढवले. यामधून जी कपाशी बचावली, त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात ‘रोटाव्हेटर’ फिरविले. जिल्ह्यात यंदा २ लाख ७ हजार ४५७ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. मात्र, बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिरोध करण्याचा जीन्स असताना बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाची बियाणे विक्री केल्यामुळेच संकट ओढावले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रयोगशाळेच्या परीक्षणाअंतीदेखील पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये गुलाबी बोंड अळीला मारक क्षमता नसल्याने सिद्ध झाल्याने शासनानेदेखील या कंपन्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याने शेतकऱ्यांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.पीकविम्याचा मिळावा लाभयंदाचा खरीप हंगाम सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पावसाने उद्ध्वस्त झाला. पावसात सलग खंड राहिला आहे. त्यामुळे एनडीआरएफ व पीक विम्याच्या निकषानुसार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळायला पाहिजे. आता तर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने ३३ टक्क््यांवर नुकसान झाले आहे. ही दोन्ही आपत्ती भरपाई मिळण्यास पात्र असल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.