शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

यंदा कपाशीची फक्त १६० किलो उत्पादकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:00 IST

यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले.

ठळक मुद्देनजरअंदाज अहवाल : शेतकरी अडचणीत, भरपाईची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता अहवाल काय दर्शवितो, याची शेतकऱ्यांना उत्सुकता होती. कापसाचे (रूई)े हेक्टरी १६० किलो उत्पादन होणार असल्याचा अहवाल शासनाला सादर झाल्याची माहिती आहे.यंदाच्या हंगामात बीटी कपाशीवर आॅक्टोबर महिन्यापासूनच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्यात ९६ टक्क््यांपर्यंत बोंडे किडली असल्याचे अहवालाद नमूद केलेले आहे. या समितीमध्ये कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचादेखील सहभाग आहे. हे ‘जीएचआय’ प्रमाणपत्र कृषी संचालकांनादेखील सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागद्वारा जाहीर करण्यात येणारी प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता काय राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता हेक्टरी १६० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचा अहवाल कृषी सहसंचालकांना सादर झाला व हीच उत्पादकता शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.यंदा पेरणीपासून कमी पावसाने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची संकट ओढवले. यामधून जी कपाशी बचावली, त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात ‘रोटाव्हेटर’ फिरविले. जिल्ह्यात यंदा २ लाख ७ हजार ४५७ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. मात्र, बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिरोध करण्याचा जीन्स असताना बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाची बियाणे विक्री केल्यामुळेच संकट ओढावले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रयोगशाळेच्या परीक्षणाअंतीदेखील पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये गुलाबी बोंड अळीला मारक क्षमता नसल्याने सिद्ध झाल्याने शासनानेदेखील या कंपन्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याने शेतकऱ्यांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.पीकविम्याचा मिळावा लाभयंदाचा खरीप हंगाम सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पावसाने उद्ध्वस्त झाला. पावसात सलग खंड राहिला आहे. त्यामुळे एनडीआरएफ व पीक विम्याच्या निकषानुसार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळायला पाहिजे. आता तर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने ३३ टक्क््यांवर नुकसान झाले आहे. ही दोन्ही आपत्ती भरपाई मिळण्यास पात्र असल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.