शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

यंदाच्या कृषी महोत्सवात मूळ उद्देशालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:55 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.प्रचार, प्रसाराअभावी तिसऱ्या दिवशीच महोत्सवाचे सूप वाजले अशी स्थिती होती. महोत्सवात बहुतांश स्टॉल कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असल्याने जे थोडेबहुत शेतकरी महोत्सवात ...

ठळक मुद्देरिकाम्या खुर्च्या अन् स्टॉल : शेतकऱ्यांशी संवाद कसा?

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.प्रचार, प्रसाराअभावी तिसऱ्या दिवशीच महोत्सवाचे सूप वाजले अशी स्थिती होती. महोत्सवात बहुतांश स्टॉल कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असल्याने जे थोडेबहुत शेतकरी महोत्सवात दाखल झाले, त्यांनीदेखील पाठ फिरविली. प्रतिसाद लाभत नसल्याने व स्टॉलचा खर्चदेखील निघणे कठीण झाल्याने महोत्सव संपण्याची वाट न पाहता अनेक स्टॉलधारकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले. यावेळी शासकीय विभागासाठी आरक्षित डोममध्ये ऐनवेळी साड्या, ज्वेलरी, कंझ्यूमर आदींचे स्टॉल लावण्यात आले. कार्यशाळा, परिसंवादात खुर्च्या रिकाम्याच राहिल्या, तर निमंत्रक अनुपस्थित राहिल्याने कार्यक्रमांचा बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. या महोत्सवस्थळी संरक्षणाचा अभाव होता. यासाठी टिनपत्र्यांचे कुंपण आवश्यक असताना प्रत्यक्षात ते दिसून आले नाही.शासनाच्या कृषी महोत्सवाचा पहिल्यांदाच फ्लॉप शोजिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्यांपैकी पहिल्यांदाच यंदाचा कृषी महोत्सवाचा फ्लॉप शो झाला. आयोजनावरील २० लाखांना निधी निव्वळ वाया गेला. याला जबाबदार जिल्ह्याची ‘आत्मा’ यंत्रणा असल्याने शासनाची एकप्रकारे नाचक्की झाली. पालकमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेतल्याने ढिसाळ आयोजनाबाबत कारवाई करणार काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.