शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

यंदा ५० हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र कमी !

By admin | Updated: April 26, 2016 23:57 IST

सलग तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे दरवर्षी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होत आहे.

महिन्यावर आला खरीप : २९ हजार हेक्टरने होणार कपाशीची क्षेत्रवाढगजानन मोहोड अमरावतीसलग तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे दरवर्षी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होत आहे. या तुलनेत तूर व कपशीने थोडा फार शेतकऱ्यांना साथ दिली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात किमान ४९ हजार २१४ हेक्टरने सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात कमी होणार असल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या तुलनेत कपाशीच्या पेरणीक्षेत्रात २८ हजार ८३४ हेक्टरने व तूर, मूग, उडीद यांच्या पेरणी क्षेत्रात २० हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे.यंदा मान्सून वेळेवर दाखल होऊन समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असली तरी शेतकरी मात्र या अंदाजावर विश्वास ठेवण्यास धजावला नाही. यापूर्वीचे हवामान खात्यांचे अंदाज वार कौलमध्ये आहे.जिल्ह्यात खरिपासाठी ७ लाख १५ हजार हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे व ४ लाख १५ हजार ८५८ शेतकरी संख्या आहे. पावसाच्या १२० दिवसांत जिल्ह्यात ८१५ मिमी. सरासरी पाऊस पडायला पाहिजे. मात्र, मागील दोन वर्षांत पावसाने पेरणीपश्चात हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे समीकरण पार कोलमडले होते. गतवर्षी खरिपासाठी ६ लाख ७८ हजार ७५ हेक्टरमध्ये पेरणी झाली. पेरणीची ही ९४.८४ टक्केवारी होती यामध्ये ३ लाख ९ हजार २१४ हेक्टरमध्ये सोयाबीन १ लाख ८६ हजार ६१५ हेक्टरमध्ये कपाती व १ लाख २ हजर हेक्टरमध्ये तुरीचे पेरणी क्षेत्र होते. या वर्षासाठी कृषी विभागाने पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. कापूस २ लाख १५ हजार ५०० हेक्टर, तूर १ लाख २० हजार हेक्टर, मूग ३५ हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, उडीद १२ हजार ५०० हेक्टर, ८ हजार ४५० हेक्टर व ईतर पिके १३ हजार ५०० हेक्टर पेरणी क्षेत्राची शक्यता आहे.पेरणी क्षेत्रात वाढीची शक्यतायंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने पीकवार व तालुकानिहाय क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जून महिन्यात वेळेत मान्सूनचे आगमन व समाधानकारक पाऊस राहिल्यास सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात २० हजाराने वाढ होऊ शकते तसेच मूग व उडीद यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊ शकते.दर्यापूर तालुक्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र प्रस्तावित खरीप २०१६ करिता कृषी विभागाने अमरावती तालुक्यात ५४,३४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. भातकुली ४९,१३० हेक्टर, नांदगाव ५८,४५० हेक्टर, तिवसा ४३ हजार ७४० हेक्टर, चांदूर रेल्वे ४३,३४० हेक्टर, धामणगाव ५० हजार ५१० हेक्टर, मोर्शी ६१,१४० हेक्टर, वरुड ४८ हजार ८० हेक्टर, चांदूरबाजार ५८ हजार ५४० हेक्टर, अचलपूर ५७ हजार ९५० हेक्टर, अंजनगाव ४४ हजार ५५० हेक्टर, धारणी ५२ हजार ३८० हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ३० हजार ५२० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे.नांदगाव तालुक्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनजिल्ह्यात सोयाबीनसाठी २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले. यामध्ये सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र नांदगाव तालुक्यात आहे. अमरावती ३२ हजार भातकुली २८ हजार, तिवसा २३ हजार, चांदूर रेल्वे २२ हजार, धामणगाव २० हजर, मोर्शी २३ हजार, वरुड ४ हजार, चांदूर बाजार १८ हजार, अंजनगाव १५ हजार, दर्यापूर १२ हजार, धारणी १८ हजार व चिखलदरा तालुक्यात १२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.