शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कामे कोट्यवधीची, मात्र देयकांसाठी सात टक्केच निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST

अमरावती : यंदा कोविडमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीला शासानाने कात्री लावली. त्याचा फटका थेट जिल्ह्यातील ५०० पेक्षा ...

अमरावती : यंदा कोविडमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीला शासानाने कात्री लावली. त्याचा फटका थेट जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त कंत्राटदारांना बसला. जिल्ह्यात अडीशे ते तीनशे कोटींची कामे कंत्राटदारांनी केली असली तरी त्या कामांच्या देयकांपोटी फक्त सात टक्केच निधीचा टप्पा त्यांना मिळाल्याने पुन्हा कंत्राटदार लॉबीमध्ये नाराजीचा सूर बघायास मिळाला.

जिल्ह्यत अमरावती डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रक्टर असोसिएशनचे नोंदणीकृत ५०० पेक्षा जास्त कंत्राटदार आहेत. त्यांनी इमारतीचे बांधकाम, रस्ते, पर्यटनस्थळाच्या विकासाची कामे व इतर अशी एकूण ३०० कोटींपेक्षा जास्त कामे केली. त्यांची देयके मार्चमध्ये मिळणे अपेक्षित होते. मार्च कोविडमुळे शासनाने बांधकाम विभागाच्या निधीला कात्री लावून ते पैसे कोरोनासाठी आरोग्य विभागात वळते केले. त्यानंतर मात्र १० टक्क्यांचा पहिला टप्पा हा कंत्राटदारांना मिळाला होता. त्यावेळेसही कंत्राटदारांचा नाराजीचा सूर होता. मात्र,आता पुन्हा १० टक्के रक्कम आली आहे. प्रत्येक शीर्षावर फक्त सात टक्केच पैसे आल्याचे एका कंत्राटदाराने सांगितले. कंत्राटदारांनी बँकांकडून, खासगी व्यापाऱ्यांकडून कर्ज काढून सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे केली. मात्र, यंदा कंत्राटदार पहिल्यांदाच फसले. काही सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांचे बँकेचे हप्ते भरणेसुद्धा अवघड झाले आहे. कंत्राटदारांची ८० टक्के जुन्या देयकांची वसुली येणे बाकी आहे. त्यामुळे नवीन कामे करताना त्यांची दमछाक होत आहे, हे विशेष!

कोट

आतापर्यंत फक्त २० टक्के देयकांचे पैसे दोन टप्प्यात कंत्राटदारांना प्राप्त झाले. मात्र, अजूनही ८० टक्के कामांची देयके मिळाली नाही. त्यामुळे अनेक कंत्राटदारांची परिस्थती यंदा बिकट आहे. कंत्राटदार जगला, तरच त्यांच्याकडून नवीन कामे होतील.

- व्ही.व्ही चांडक, कंत्राटदार तथा संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक