शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय महामार्गाचे काम दफ्तरदिरंगाई, कंत्राटदारांमुळे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:16 IST

अमरावती : जिल्ह्यातील अमरावती-नागपूर आठ राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारकरणाचे काम अनेक वर्षांपासून गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सुरू आहेत. या ...

अमरावती : जिल्ह्यातील अमरावती-नागपूर आठ राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारकरणाचे काम अनेक वर्षांपासून गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सुरू आहेत. या महामार्गाच्या कामातील कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरून आवागमन करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यामध्ये आठ प्रमुख महामार्ग असून, नांदगावपेठ-पांढुर्णा राज्य मार्ग, बऱ्हाणपूर-चांदा, अकोट-बैतुल, धामणगाव-यवतमाळ, अमरावती-चांदूर रेल्वे, मुलताई-वर्धा यांचे काम पूर्ण होऊन त्यावर वाहतूक सुरू झाली आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गाचे काम जिल्ह्यात सुरू आहे.

समृद्धी महामार्गाचे अमरावती जिल्ह्यात ७४ किलोमीटरचे काम सुरू आहे. हा महामार्ग नांदगाव खंडेश्वर चांदुर रेल्वे धामणगाव रेल्वे यातील तालुक्यातून ४६ गावातून गेला आहे. ८० टक्के या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे त्यात ५७ किलो मीटर चे कॉंक्रिटीकरण पूर्ण तर सतरा किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. या महामार्गावर चोऱ्याचे प्रमाण अधिक वाढले असून आतापर्यंत २५ तक्रारी मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव दशासर, नांदगाव खंडेश्वर या पोलीस ठाण्यात नोंद आहे. नांदगाव खंडेश्वर परिसरात सुलतानपूर येथे असलेल्या एनसीसी कंपनीतील कर्मचाऱ्यांना या परिसरात दररोज स्थानिक गुंड धमक्या देत असल्याच्या तक्रारी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवल्याची माहिती एनसीसी कंपनीचे व्यवस्थापक नीरजकुमार यांनी दिली.

समृद्धी महामार्ग

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम १६ टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणालाही प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यातील ३८ नाल्यांचे ९१ हजार २१० मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धीदेखील झाली आहे.

हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होताच नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.

------------------------

अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अकोल्यातून अमरावतीपर्यंत सुरू झालेले काम तूर्तास रखडले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दहीगाव ते बडनेराबाहेरील बायपासपर्यंत आलेला हा राष्ट्रीय महामार्ग तळेगाव ते अमरावतीदरम्यान चारपदरी होऊन वाहतूकदेखील सुरळीत झाली आहे. तथापि, अमरावती ते अकोला मार्गावरील अरुंद, काठाने खोदून ठेवलेले रस्ते व त्यावरील खड्डे कायम आहेत.

--------------

वाशीममध्ये काय घडले, याबद्दल मला माहिती नाही. पण, आम्हा शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबाबत कसलाही संशय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलीकडच्या दौऱ्यात समृद्धी महामार्गावर आम्ही सर्व शिवसैनिक उपस्थित होतो. प्रगतीच्या वाटांमध्ये अडथळा नको, हे धोरण सुरुवातीपासून शिवसेना राबवित आहे.

- सुनील खराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख

---------------

मागास म्हणून शिक्का असलेल्या वऱ्हाडाचा भाग समृद्धी महामार्गाने मुंबई या आर्थिक केंद्राशी जोडला जाणार आहे. त्यामुळे दळणवळण जलद होईल. आमच्याकडच्या शेतमालाला बाजारपेठ मिळेल, याहून आणखी काय हवे? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा प्रकल्प आणून विदर्भाला समृद्धीच्या मार्गावर नेले आहे.

- निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप