शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
2
चारवेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
4
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
5
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
6
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
7
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
8
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
9
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
10
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
11
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
12
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात
13
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
15
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
17
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
18
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
19
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
20
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम

जयस्तंभ चौकातील राष्ट्रीय महामार्गाचे काम खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:14 IST

फोटो - गोपाल डहाके - मोर्शी : स्थानिक जयस्तंभ चौकातील शासकीय जमिनीच्या पट्टेधारकांनी शासनाने दिलेल्या पर्यायी जमिनीवर दुकाने बांधून ...

फोटो -

गोपाल डहाके - मोर्शी : स्थानिक जयस्तंभ चौकातील शासकीय जमिनीच्या पट्टेधारकांनी शासनाने दिलेल्या पर्यायी जमिनीवर दुकाने बांधून धंदा सुरू केला. दुसरीकडे मूळ शासकीय जागा आतापावेतो शासनाला परत न देता भाड्याने इतरांना दिली. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम खोळंबले आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विशिष्ट नागरिकांना जयस्तंभ चौक येथे शासनाने दुकाने लावण्याकरिता जमीन वार्षिक भाडेतत्त्वावर दिली होती. मूळ पट्टेधारकास दरवर्षी भाडे भरून भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. या शासकीय जमिनीवर कच्चे बांधकाम करण्याची परवानगी दिली गेली होती. राज्य महामार्ग अमरावती ते पांढुर्णा निर्मितीप्रसंगी संबंधित दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याची सूचना प्रशासनाने दिल्यावर ही मंडळी न्यायालयात गेली. शासनातर्फे तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात या लोकांना त्यांच्या पसंतीप्रमाणे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची आणि पर्यायी जागा दिल्यावर सहा महिन्यांचा कालावधी बांधकामास दिल्यानंतर संबंधित अतिक्रमण हटविण्याचे प्रतिज्ञा सादर केले होते. इकडे महसूल प्रशासनाने संबंधितांना काही जमिनी दाखविल्या होत्या; मात्र प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांच्या पसंतीस त्या जागा उतरल्या नाही. दुसरीकडे राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आणि राजस्व विभागाने दत्त मंदिराजवळील मुख्य महामार्गाशेजारील शासकीय जागा या व्यापाऱ्यांना देण्याची तयारी दर्शविली. सर्वच पर्यायी जागेवर दुकाने बांधण्यात आली. मात्र, अतिक्रमणावर काही दुकानदारांनी आता पोट भाडेकरू ठेवले आहेत.

मंत्र्यांचा हस्तक्षेप

मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिल्यावर काहींनी थेट जिल्ह्यातील एका मंत्र्याकडे धाव घेऊन मुख्याधिकाऱ्यांना काही महिन्यांकरिता अतिक्रमण थांबविण्याची गळ घातली. कोणतीही शहानिशा न करता या राजकीय नेत्याने मुख्याधिकाऱ्यांना तीन महिने संबंधित अतिक्रमण न हटविण्याचे मौखिक निर्देश दिले. हा कालावधी केव्हाच संपला आहे.

अतिक्रमण हटणार केव्हा?

एका सायकल दुकानदाराने अर्धे दुकान रिक्त करून दिले, पण आता पुन्हा अर्ध्या जागेवर टिनपत्रे टाकून दुकान वाढविले. जयस्तंभ चौकातील या अतिक्रमणामुळे वाहतुकीस आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित अतिक्रमणाची जागा सोडून रस्त्याची निर्मिती केली आहे. अतिक्रमण हटविल्यावर या जागेवर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे.