शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

पावतीविना व्यवहार, काय करते ‘सहकार’

By admin | Updated: January 21, 2017 00:07 IST

सावकारी व्यवसायातील कुबडे ज्वेलर्समध्ये पावतीविना व्यवहार चालतात, ही बाब मनीष जाधव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्ट झाली.

सावकारीचा गोरखधंदा : कुबडेचा अद्याप सुगावा नाहीअमरावती : सावकारी व्यवसायातील कुबडे ज्वेलर्समध्ये पावतीविना व्यवहार चालतात, ही बाब मनीष जाधव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्ट झाली. मात्र, हा गैरप्रकार सुरू असताना सहकार संस्था करते तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजय कुबडे अद्यापही पसार असून पोलिसांना त्याचा सुगावा लागलेला नाही. गांधी चौकातील कुबडे ज्वेलर्सने ६२० कर्जदार शेतकऱ्यांची यादी देण्यास विलंब केल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे याप्रतिष्ठानाचे प्रोप्रायटर विजय कुबडेविरूद्ध १२ जानेवारी रोजी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही अद्याप विजय कुबडेला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. दरम्यान सातरगाव येथील रहिवासी मनीष जाधव यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यामध्ये सावकारीचा व्यवसाय करणारे सावकार व्याजाचे पैसे घेऊनही ग्राहकांना पावती देत नसल्याचे सांगत आहेत.स्वतंत्र चौकशी व्हावीअमरावती : अशिक्षित व भोळेभाबडे शेतकरी सोने गहाण ठेवण्यासाठी सावकारांकडे जातात. मात्र, त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन हे सावकार त्यांची फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट मत जाधव यांनी मांडले. कर्जमाफीच्या मुदतीनंतरही कुबडे ज्वेलर्सने कर्जदार शेतकऱ्यांकडून व्याजाचे पैसे घेतले. मात्र, या व्यवहाराची पावती त्यांना दिली नाही. असे प्रकार अनेक सावकारांकडे सुरू आहेत. याप्रकारावर जिल्हानिबंधकांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा तरूण व जागरूक शेतकरी मनीष जाधव यांनी व्यक्त केली आहे. जाधव यांना कुबडे ज्वेलर्समधून पावती देण्यात आली नाही. जिल्ह्यात असे हजारो सावकार कर्जवाटप करतात. यातून कित्येक शेतकऱ्यांची नाडवणूक होते. त्यांना न्याय देखील मिळत नाही. त्यामुळे अशा सावकारांचा हा गोरखधंदा उघड व्हायला हवा. शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही शेतकरी मनीष जाधव यांनी केला आहे व कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी) वेगळा गुन्हा दाखल करावाभोळ्याभाबड्या व अशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब तरुण व जागरूक शेतकरी मनीष जाधव यांनी सहकार संस्थेच्या निदर्शनास आणून दिली आहे. सावकारी व्यवसायातील विनापावतीचे कनेक्शन जाधव यांनी उघड केले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल करणे अपेक्षित ठरते. शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी पुढे येणे आवश्यकसावकारीफासात अडकलेल्या शेतकऱ्यांनी सावकारांविरुद्ध तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. मनीष जाधव या शेतकऱ्याने पहिले पाऊल टाकले असून जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनी संघटित होऊन अशा सावकारी गोरखधंद्याविरुद्ध एकजुटीने लढा उभारावा.