शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयाविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST

कॉमन/ गणेश वासनिक अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरील ...

कॉमन/

गणेश वासनिक

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरील फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १३ ऑगस्ट रोजी खारीज केला. या निर्णयाविरुद्ध आता राज्य शासन सर्वाेच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्याअनुषंगाने बेलदार समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्धारे दीपाली यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

२५ मार्च २०२१ रोजी दीपाली यांनी शासकीय निवासस्थानी रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. २६ मार्च रोजी दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांच्या तक्रारीवरून २६ मार्च रोजी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी हेदेखील याप्रकरणी दोषी असल्याची जनभावना पुढे आली. त्यानंतर महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी अतुल कोदे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित शासनादेशाद्वारे राज्य शासनाने अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत चौकशी अहवाल सादर करण्यासाठी समिती गठित केली होती.

त्यानुसार प्रज्ञा सरवदे आणि त्यांची चमू मेळघाट, अमरावतीत दोन दिवस मुक्कामी होते. चौकशीअंती डॉ. सरवदे या स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गाठले आणि २९ एप्रिल २०२१ रोजी एम.एस. रेड्डी यांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्याच दिवशी रेड्डी यांना नागपुरातून अटक करण्यात आली होती. भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतर रेड्डी यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर रेड्डी यांनी धारणी पोलिसांत दाखल फौजदारी गुन्हा खारीज करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर ४ ऑगस्ट २०२१ रोजी सुनावणी झाली आणि रेड्डी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे. रेड्डी हेसुद्धा दोषी असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बेलदार समाजाच्या वतीने निवेदन देऊन दीपाली हिला न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी यासाठी साकडे घातले आहे.

कोट

मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दीपाली हिला नक्कीच न्याय मिळेल. लवकरच राज्य शासन उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मागणीबाबतचे ई-मेल, निवेदन पाठविले आहे.

- राजू साळुंखे, अध्यक्ष, बेलदार समाज संघटना.