शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयाविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST

कॉमन/ गणेश वासनिक अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरील ...

कॉमन/

गणेश वासनिक

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरील फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १३ ऑगस्ट रोजी खारीज केला. या निर्णयाविरुद्ध आता राज्य शासन सर्वाेच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्याअनुषंगाने बेलदार समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्धारे दीपाली यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

२५ मार्च २०२१ रोजी दीपाली यांनी शासकीय निवासस्थानी रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. २६ मार्च रोजी दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांच्या तक्रारीवरून २६ मार्च रोजी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी हेदेखील याप्रकरणी दोषी असल्याची जनभावना पुढे आली. त्यानंतर महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी अतुल कोदे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित शासनादेशाद्वारे राज्य शासनाने अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत चौकशी अहवाल सादर करण्यासाठी समिती गठित केली होती.

त्यानुसार प्रज्ञा सरवदे आणि त्यांची चमू मेळघाट, अमरावतीत दोन दिवस मुक्कामी होते. चौकशीअंती डॉ. सरवदे या स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गाठले आणि २९ एप्रिल २०२१ रोजी एम.एस. रेड्डी यांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्याच दिवशी रेड्डी यांना नागपुरातून अटक करण्यात आली होती. भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतर रेड्डी यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर रेड्डी यांनी धारणी पोलिसांत दाखल फौजदारी गुन्हा खारीज करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर ४ ऑगस्ट २०२१ रोजी सुनावणी झाली आणि रेड्डी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे. रेड्डी हेसुद्धा दोषी असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बेलदार समाजाच्या वतीने निवेदन देऊन दीपाली हिला न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी यासाठी साकडे घातले आहे.

कोट

मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दीपाली हिला नक्कीच न्याय मिळेल. लवकरच राज्य शासन उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मागणीबाबतचे ई-मेल, निवेदन पाठविले आहे.

- राजू साळुंखे, अध्यक्ष, बेलदार समाज संघटना.