शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

‘त्या’ निर्णयाविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST

कॉमन/ गणेश वासनिक अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरील ...

कॉमन/

गणेश वासनिक

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरील फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १३ ऑगस्ट रोजी खारीज केला. या निर्णयाविरुद्ध आता राज्य शासन सर्वाेच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्याअनुषंगाने बेलदार समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्धारे दीपाली यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

२५ मार्च २०२१ रोजी दीपाली यांनी शासकीय निवासस्थानी रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. २६ मार्च रोजी दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांच्या तक्रारीवरून २६ मार्च रोजी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी हेदेखील याप्रकरणी दोषी असल्याची जनभावना पुढे आली. त्यानंतर महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी अतुल कोदे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित शासनादेशाद्वारे राज्य शासनाने अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत चौकशी अहवाल सादर करण्यासाठी समिती गठित केली होती.

त्यानुसार प्रज्ञा सरवदे आणि त्यांची चमू मेळघाट, अमरावतीत दोन दिवस मुक्कामी होते. चौकशीअंती डॉ. सरवदे या स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गाठले आणि २९ एप्रिल २०२१ रोजी एम.एस. रेड्डी यांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्याच दिवशी रेड्डी यांना नागपुरातून अटक करण्यात आली होती. भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतर रेड्डी यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर रेड्डी यांनी धारणी पोलिसांत दाखल फौजदारी गुन्हा खारीज करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर ४ ऑगस्ट २०२१ रोजी सुनावणी झाली आणि रेड्डी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे. रेड्डी हेसुद्धा दोषी असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बेलदार समाजाच्या वतीने निवेदन देऊन दीपाली हिला न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी यासाठी साकडे घातले आहे.

कोट

मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दीपाली हिला नक्कीच न्याय मिळेल. लवकरच राज्य शासन उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मागणीबाबतचे ई-मेल, निवेदन पाठविले आहे.

- राजू साळुंखे, अध्यक्ष, बेलदार समाज संघटना.