शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

नवीन नगरपंचायतींच्या कार्यकक्षा कधी ठरणार ?

By admin | Updated: November 24, 2015 00:17 IST

राज्यात एकूण २३९ नगरपरिषदा आहेत. यामध्ये नव्याने १०० नगरपंचायती समाविष्ट झाल्यात.

कारभारावर प्रश्नचिन्ह : अद्याप मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती नाहीअमरावती : राज्यात एकूण २३९ नगरपरिषदा आहेत. यामध्ये नव्याने १०० नगरपंचायती समाविष्ट झाल्यात. या नवनिर्मिती नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० नोव्हेंबरला होत आहे. मात्र, या नगरपंचायतींच्या कार्यकक्षा स्पष्ट ठरलेल्या नाहीत. मुख्यधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या नसल्याने या नवनिर्मित नगरपंचायतींच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. राज्यातील २३९ नगरपरिषदांच्या कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहेत. परंतु नवनिर्मित १०० नगरपंचायतींची कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य याविषयी कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे नगरविकासने स्पष्ट केलेली नाहीत. केवळ नगरपरिषद व नगरपंचायतींना सारखे अधिकार आहेत, असे सांगण्यात येते. याविषयी शासनाचे कुठलेही स्पष्ट आदेश नाहीत. नगरपंचायती ठरल्या शोभेचे बाहुलेअमरावती : नगराध्यक्षांची निवडणूक ३० नोव्हेंबरला झाल्यानंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. त्या ठिकाणी आता मुख्याधिकारी राहतील. परंतु जिल्ह्यातील तिवसा, नांदगाव, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चारही नगरपंचायतीमध्ये अद्यापपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्ती झालेल्या नाहीत. चांदूररेल्वेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने तेथल प्रभार हा धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. मात्र नव्याने गठीत नगरपंचायतींमध्ये कोण मुख्याधिकारी राहणार हे शासनाने स्पष्ट केलेले नाही. नगरपंचायतींची इमारत, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, गटनेते, समिती प्रमुख यांना कक्ष, नगराध्यक्षांना वाहने, कर्मचाऱ्यांचे समयोजन, कराची आकारणी आदी विषयी शासनाने कुठलेही धोरण स्पष्ट केले नसल्याने नगरपंचायती शोभेचे बाहुले बनल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. मात्र नगरपंचायतीच्या कार्यकक्षा स्पष्ट नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.