शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वन्यप्राण्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

पोहरा : वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या हौसेखातर चिरोडी तलावावर अमरावती शहरातील युवकांचे जत्थे येत आहेत. त्यांनी सोबत आणलेल्या वाहनांच्या वर्दळीने ...

पोहरा : वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या हौसेखातर चिरोडी तलावावर अमरावती शहरातील युवकांचे जत्थे येत आहेत. त्यांनी सोबत आणलेल्या वाहनांच्या वर्दळीने प्रदूषणात भर घालण्यासोबतच तलावावर पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी पळून जातात. तलावाच्या परिसरात ऐन जनावरांच्या पाणी पिण्याच्या वेळेला गर्दी राहते. प्रतिबंधित क्षेत्रात होणारी ही गर्दी हटविण्यासाठी कुठलीही उपाययोजना अद्याप वनविभागाने केलेली नाही.

चिरोडी वर्तुळातील पश्चिम चिरोडी बीटमधील तलाव परिसरात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वावर आता सर्वांनाच ठाऊक आहे. तलाव परिसरात बिबट्यासह अन्य वन्यप्राणी आढळून येत असल्याने शहरातील तरुणांमध्ये या परिसराचे आकर्षण आहे. अमरावती शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर तलाव परिसरात अप्रतिम निसर्गसौंदर्य असल्याने दिवसेंदिवस युवकांची पावले त्याकडे वळली आहेत. त्यामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा हौस असणाऱ्या नवख्या, श्रीमंत तरुणांचा भरणा आहे. या ठिकाणाला भेट देऊन एकदा तरी बिबट्याचे दर्शन घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. एवढेच नव्हे तर सोबतीला मित्र आणि खाण्याचे पदार्थ घेऊन पिकनिकला जाण्याच्या अविर्भावात हे कथित वन्यप्रेमी येथे दाखल होतात. या तलाव परिसराच्या कडेला बसून भोजनाचासुद्धा आस्वाद घेतात. त्यांच्या वारंवार दाखल होण्यामुळे वन्यजिवांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे.

चर खोदला, त्यानंतर स्वस्थता

मुळात वन्यपरिसर हा माणसांकरिता प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे वाहने रोखण्याकरिता तलावाकडे नेणाऱ्या पाऊलवाटेवर वनविभागाने चर खोदले. तेथपर्यंत वाहन नेऊन त्यापुढे पायी तलावाकडे जाऊन बिबट व आदी वन्य प्राण्यांचे फोटोसेशन करण्यासाठी भल्या पहाटे व रात्री अंधार पडल्यानंतर युवक आढळून येतात. चर खोदल्यानंतर मात्र वनविभागाने काहीही केलेले नाही.

-------------

मानव-वन्यप्राणी संघर्षाची भीती

जंगलातील एकमेव तलावावर शहरवासीयांनी ताबा केल्याने वन्यप्राणी पाण्याशिवाय परततात. अशा प्रसंगात एखादेवेळी बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ल्याची व त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

आळा बसेल तरी केव्हा?

वनक्षेत्रात मनुष्याने प्रवेश केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध वन अधिनियमांनुसार गंभीर स्वरूपाचे वनगुन्हे दाखल करण्याबाबतचे फर्मान असून, या संरक्षित तलाव परिसराच्या वनक्षेत्रात प्रवेश करणे निषिद्ध आहे. ही नियमावली असूनही युवकांचा सततचा वावर ही बाब वन्यपशू, वन्यजिवांसाठी धोकादायक ठरणारी आहे. या नियमबाह्य प्रकाराला केव्हा आळा बसेल, याची प्रतीक्षा वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.