शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमातील वरूड्याच्या सागरनेही गमावला जीव

By admin | Updated: September 16, 2016 01:03 IST

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक

पुन्हा व्हावा तपास : श्रीनिवास घाडगे यांनी शोधावे सत्य अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक मुलाचाही दहा वर्षांपूर्वी संशयास्पदरित्या जीव गेल्याची माहिती शोधमोहिमेत उघड झाली आहे. प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या मुलांचे नरबळी घेण्याचा जो प्रयत्न आश्रमात झाला त्या पार्श्वभूमीवर सागरच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याची पाळेमुळे खणणे हे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सन २००६ साली घडलेल्या या संशयास्पद मृत्यूच्या घटनेची कुठेही वच्यता होणार नाही, याची शक्य ती काळजी घेण्यात आली. मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याने या घटनेसंबंधी काय भूमिका निभावली, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. सागर कोण? सागर दिवाकर पात्रे हा तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा गोंडस मुलगा. आश्रमातील शाळेत इयत्ता दहावीत तो शिकत होता. सागर शंकर महाराजांच्या सेवेत अधिक रमायचा. शिक्षणात कमी आणि पुजादी कार्यात अधिक वेळ सागर घालवित होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सागरचा मोठा भाऊ रूपेश हा देखील आश्रमात असायचा. दहा वर्षांपूर्वी, २००६ साली, सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला अघटित घडले. महाराजांच्या सेवेत रमणाऱ्या सागरला मृत्यूने गाठले. त्यादिवशी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास सागर अचानक मरणासन्न अवस्थेत असल्याचे पाहिले गेले. सागर आश्रमातच निपचित पडलेला होता. घटनेची माहिती त्याचा थोेरला भाऊ, रूपेशपर्यंत पोहोचली. रूपेशच्या मते ज्यावेळी तो सागरजवळ पोहोचला, त्यावेळी सागरमध्ये धुगधुगी होती. आश्रमातील लोकांनी सागरला नजीकच्या अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. सागरची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला धामणगावला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सागरसोबतच्या मंडळींनी त्याला धामणगावच्या खासगी रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयाने सागरला अमरावतीला नेण्याचा सल्ला दिला. अमरावतीसाठी सागरला हलविण्यात आले. बहुदा वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आश्रमात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेला, धार्मिक कार्यात मग्न रहणारा सागर असा अचानक निघून गेला. सागरचा प्रवेश आश्रमातील शाळेत करण्यात आला नसता, तो बाहेर शिकत असता तर मरणाने त्याला गाठले नसते. आश्रमात अध्येमध्ये काही विद्यार्थ्यांवर मरण अचानक झडप घेते, यामागचे रहस्य तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी उलगडायला हवे. हाती लागलेले तीन गुन्हेगार अंतिम समजून, उडकीस आलेले दोन गुन्हे अखेरचे समजून तपासात समाधान मानण्याऐवजी; कालौघात दबलेले गुन्हे उघडकीस आणणे, हेच खरे तपास अधिकाऱ्याचे कर्तव्य ठरते.