शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

आश्रमातील वरूड्याच्या सागरनेही गमावला जीव

By admin | Updated: September 16, 2016 01:03 IST

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक

पुन्हा व्हावा तपास : श्रीनिवास घाडगे यांनी शोधावे सत्य अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक मुलाचाही दहा वर्षांपूर्वी संशयास्पदरित्या जीव गेल्याची माहिती शोधमोहिमेत उघड झाली आहे. प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या मुलांचे नरबळी घेण्याचा जो प्रयत्न आश्रमात झाला त्या पार्श्वभूमीवर सागरच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याची पाळेमुळे खणणे हे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सन २००६ साली घडलेल्या या संशयास्पद मृत्यूच्या घटनेची कुठेही वच्यता होणार नाही, याची शक्य ती काळजी घेण्यात आली. मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याने या घटनेसंबंधी काय भूमिका निभावली, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. सागर कोण? सागर दिवाकर पात्रे हा तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा गोंडस मुलगा. आश्रमातील शाळेत इयत्ता दहावीत तो शिकत होता. सागर शंकर महाराजांच्या सेवेत अधिक रमायचा. शिक्षणात कमी आणि पुजादी कार्यात अधिक वेळ सागर घालवित होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सागरचा मोठा भाऊ रूपेश हा देखील आश्रमात असायचा. दहा वर्षांपूर्वी, २००६ साली, सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला अघटित घडले. महाराजांच्या सेवेत रमणाऱ्या सागरला मृत्यूने गाठले. त्यादिवशी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास सागर अचानक मरणासन्न अवस्थेत असल्याचे पाहिले गेले. सागर आश्रमातच निपचित पडलेला होता. घटनेची माहिती त्याचा थोेरला भाऊ, रूपेशपर्यंत पोहोचली. रूपेशच्या मते ज्यावेळी तो सागरजवळ पोहोचला, त्यावेळी सागरमध्ये धुगधुगी होती. आश्रमातील लोकांनी सागरला नजीकच्या अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. सागरची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला धामणगावला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सागरसोबतच्या मंडळींनी त्याला धामणगावच्या खासगी रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयाने सागरला अमरावतीला नेण्याचा सल्ला दिला. अमरावतीसाठी सागरला हलविण्यात आले. बहुदा वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आश्रमात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेला, धार्मिक कार्यात मग्न रहणारा सागर असा अचानक निघून गेला. सागरचा प्रवेश आश्रमातील शाळेत करण्यात आला नसता, तो बाहेर शिकत असता तर मरणाने त्याला गाठले नसते. आश्रमात अध्येमध्ये काही विद्यार्थ्यांवर मरण अचानक झडप घेते, यामागचे रहस्य तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी उलगडायला हवे. हाती लागलेले तीन गुन्हेगार अंतिम समजून, उडकीस आलेले दोन गुन्हे अखेरचे समजून तपासात समाधान मानण्याऐवजी; कालौघात दबलेले गुन्हे उघडकीस आणणे, हेच खरे तपास अधिकाऱ्याचे कर्तव्य ठरते.