शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आश्रमातील वरूड्याच्या सागरनेही गमावला जीव

By admin | Updated: September 16, 2016 01:03 IST

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक

पुन्हा व्हावा तपास : श्रीनिवास घाडगे यांनी शोधावे सत्य अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक मुलाचाही दहा वर्षांपूर्वी संशयास्पदरित्या जीव गेल्याची माहिती शोधमोहिमेत उघड झाली आहे. प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या मुलांचे नरबळी घेण्याचा जो प्रयत्न आश्रमात झाला त्या पार्श्वभूमीवर सागरच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याची पाळेमुळे खणणे हे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सन २००६ साली घडलेल्या या संशयास्पद मृत्यूच्या घटनेची कुठेही वच्यता होणार नाही, याची शक्य ती काळजी घेण्यात आली. मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याने या घटनेसंबंधी काय भूमिका निभावली, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. सागर कोण? सागर दिवाकर पात्रे हा तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा गोंडस मुलगा. आश्रमातील शाळेत इयत्ता दहावीत तो शिकत होता. सागर शंकर महाराजांच्या सेवेत अधिक रमायचा. शिक्षणात कमी आणि पुजादी कार्यात अधिक वेळ सागर घालवित होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सागरचा मोठा भाऊ रूपेश हा देखील आश्रमात असायचा. दहा वर्षांपूर्वी, २००६ साली, सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला अघटित घडले. महाराजांच्या सेवेत रमणाऱ्या सागरला मृत्यूने गाठले. त्यादिवशी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास सागर अचानक मरणासन्न अवस्थेत असल्याचे पाहिले गेले. सागर आश्रमातच निपचित पडलेला होता. घटनेची माहिती त्याचा थोेरला भाऊ, रूपेशपर्यंत पोहोचली. रूपेशच्या मते ज्यावेळी तो सागरजवळ पोहोचला, त्यावेळी सागरमध्ये धुगधुगी होती. आश्रमातील लोकांनी सागरला नजीकच्या अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. सागरची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला धामणगावला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सागरसोबतच्या मंडळींनी त्याला धामणगावच्या खासगी रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयाने सागरला अमरावतीला नेण्याचा सल्ला दिला. अमरावतीसाठी सागरला हलविण्यात आले. बहुदा वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आश्रमात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेला, धार्मिक कार्यात मग्न रहणारा सागर असा अचानक निघून गेला. सागरचा प्रवेश आश्रमातील शाळेत करण्यात आला नसता, तो बाहेर शिकत असता तर मरणाने त्याला गाठले नसते. आश्रमात अध्येमध्ये काही विद्यार्थ्यांवर मरण अचानक झडप घेते, यामागचे रहस्य तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी उलगडायला हवे. हाती लागलेले तीन गुन्हेगार अंतिम समजून, उडकीस आलेले दोन गुन्हे अखेरचे समजून तपासात समाधान मानण्याऐवजी; कालौघात दबलेले गुन्हे उघडकीस आणणे, हेच खरे तपास अधिकाऱ्याचे कर्तव्य ठरते.