शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जंगलातील पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान

By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST

वडाळी व चांदूररेल्वे वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्यामुळे हे पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान ठरले आहे.

रेलचेल वाढली : वन्यप्राणी गणनेसाठी वन्यप्रेंमीत उत्सुकतावैभव बाबरेकर अमरावतीवडाळी व चांदूररेल्वे वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्यामुळे हे पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान ठरले आहे. शहरालगतच्या जंगलात यंदा प्रथमच वन्यप्राणी गणना होत असल्यामुळे पानवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी वन्यप्रेंमीमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाणीपातळी खालावत असल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांना काही नैसर्गिक, तर कृत्रिम पाणवठ्यांवर अवलंबून राहावे लागते. पाणीस्त्रोत कमी झाल्याने पाणवठेच वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. यंदा पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात तब्बल १५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांवर वन्यप्राणी गणना केली जाणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पाणवठ्याजवळ मचाण बांधून ही होणार आहे. प्रत्येक वन्यप्राण्याला २४ तासांतून एकदा पाणी प्यावेच लागते, त्यासाठी प्राणी हे पाणवठ्यावर जातात. प्राणी गणना करताना त्यांना त्रास न होता नोंदी घेणे अपेक्षित असते. या नोंदीवरून प्राणी प्रजातींच्या संख्येचा अंदाज येतो. यंदा मार्च महिन्याच्या अखेरच तापमान ४५ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे उन्हाच्या झळांनी मनुष्यासह वन्यप्राणीसुध्दा होरपळून निघालेत. जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांनी पाणवठ्यांचा आधार घेतला आहे. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दररोज पानवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू असल्याची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद होत आहेत. कातलबोडीतील वाघ पोहरा-चिरोडी जंगलात वास्तव्यास असल्यामुळे ट्रॅप कॅमेऱ्यांवर दररोज मॉनिटरींग सुरू आहे. पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू झाली आहे.मचाणीवर रोमांचक अनुभव येणारपोहरा-चिरोडी जगंलात प्रथमच मचाण बांधून वन्यप्राण्यांची गणना होणार असून यादरम्यान वन्यप्रेंमीना रोमांचक अनुभव घेता येणार आहे. २४ तास मचाणवर बसून वन्यप्राण्यांची गणना करताना कोणकोणते वन्यप्राणी पानवठ्यावर येतात, यांच्या नोंदी वन्यप्रेंमी घेणार असून यादरम्यान त्यांना विविध अनुभव येणार आहे. पोहरा-चिरोडी जंगलात १५ मचाणी बांधण्याचे काम सुरू आहे. १० मे रोजी पाणवठ्यावर वन्यप्राणी गणना केली जाणार आहे. पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी विविध प्रजातींच्या वन्यप्राण्यांची रेलचेल वाढली आहे. - हेमंतकुमार मीणा, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभागपाणीस्त्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांना कृत्रिम पाणवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सद्यस्थितीत पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची मोठी रेलचेल सुरू झाली असून वन्यप्राणी गणनेत वन्यप्रेंमींना रोमांचक अनुभव घेता येणार आहे. - स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक