शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

वन्यप्राण्यांचा हल्ला; अर्थसहाय्यात वाढ

By admin | Updated: November 14, 2016 00:11 IST

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन, मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम कमी ..

शासन निर्णय निर्गमित : ४८ तासांच्या आत घटनास्थळाचा पंचनामा अनिवार्यअमरावती : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन, मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम कमी असल्यामुळे त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्त व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे वन्य पशुंच्या हल्ल्यातील जखमी, मृत व्यक्तिंना दिलासा मिळणारा आहे. याबाबतचा निर्णय महसूल व वनविभागाने ११ नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुकर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे गाय, बैल, म्हैस, मेंढी, शेळी किंवा इतर पशुधन मृत, अपंग तसेच जखमी झाल्यास २ जुलै २०१० शासन निर्णयाद्वारे नुकसान भरपाईची रक्कम संबंधिताना प्रदान करण्यात येते. परंतु अर्थसहाय्याची रक्कम कमी असल्यामुळे त्यात वाढ करण्याची बाब शासन विचाराधीन होती. त्याअनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा २५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम नव्या अर्थसहाय्यात दिली जाणार आहे. मेंढी, बकरी आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के रक्कम किंवा ६ हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम दिली जाईल. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा ७ हजार ५०० रुपये यापैकी कमी असणारी रक्कम अर्थसहाय्य म्हणून देय करण्यात येणार आहे. गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करण्यात येणार आहे. देय मर्यादा रक्कम बाजारभावाच्या २५ टक्के किंवा दोन हजार ५०० रुपये प्रति जनावर यापैकी कमी असणारी रक्कम तसेच सदर अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे नवीन शासन निणर्यात नमूद आहे. जनावर मालकाने पशू मेल्यावर किंवा घटना घडल्यावर ४८ तासाच्या आत नजिकच्या वनाधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कळविणे गरजेचे आहे. वन्य पशुंच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित वनपालाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन ताडडीने पंचनामा करणे अनिवार्य आहे. संबंधित अर्थसहाय्यतेची रक्कम पशुधन मालकाच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच हल्ल्यात मृत व्यक्तिच्या कुंटुंबियांना ८ लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वन्यपशुंमुळे शेतीपिकाचे होणारे नुकसान भरपाईसाठी अर्थसहाय्य रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतीकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)महसूल व वने मंत्रालयाकडून निर्गमित झालेल्या शासन आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत जनावरांचा घटनास्थळी पंचनामा करुन मालकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.- हेमंत मीनाउपवनसंरक्षक, अमरावती.