शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हिंदी भाषकांची अनेक राज्ये, मराठी माणसांची का नाहीत?

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या

अमरावती : देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची चळवळ गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले.जनमंच लढा विदर्भाचा व विदर्भ माझा संघटनेच्यावतीने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आॅडिटोरियम हॉलमध्ये बुधवारी ‘वेगळ्या विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’ या विषयावर जाहीर व्याख्यानात ते प्रमुख व्यक्त म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड तर प्रमुख अतिथी म्हणून अतुल यादगिरे, अरुण वरणगावकर, बबन बेलसरे, अतुल गायगोले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना, श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य निर्मितीबाबत हेतुपुरस्सर गैरसमज पसरविले जात आहे. ‘जय विदर्भ’ म्हटले तर महाराष्ट्र तोडण्याची भाषा म्हणून संबोधले जाते, मात्र ‘जय महाराष्ट्र ’ म्हटले तर देशविरोधी होते काय, असा सवाल उपस्थितांच्या पुढ्यात ठेवला. अणे यांनी विदर्भ राज्य निर्मितीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य, गोंड राजे, सीपी अ‍ॅन्ड बेरार, ब्रिटीशांचा कार्यकाळ, इंडियन नॅशनल कॉंग्रेस, अकोला करार, राज्य घटनेमध्ये विदर्भाविषयी तरतूद, अनुशेषाची टोलवाटोलवी, विदर्भ राज्य निर्मितीबाबत कमिशन नेमण्याचा फार्स, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची फसवेगिरी, असा इतिहास उलगडला. राज्यपालांना अनुशेष भरण्याचे विशेष अधिकार असताना राज्यकर्त्यांनी या अधिकाराला कशी बगल दिली, हे उदाहरणानिशी पटवून सांगितले. वेगळ्या विदर्भाशिवाय विकास नाही, त्यामुळे आता जय विदर्भाचा हुंकार पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.